बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

देवा आण्णांना तेजोमय राष्ट्रीय प्रेरणा ज्योत बनव ....


आण्णाना .....आण्णाच राहू द्या.......गांधी  बनवू  नका.......!!!!!





भारत देश हा पुरातन सनातन राष्ट्र  आहे या देशांनी आजवर अनेक धोके खाले आहेत ह्याची साक्ष आपला इतिहास देतो. आज पर्यंत  या देशाला काणत्याही  विदेशी  ताकतीने पराजित केले नाही. जेव्हा जेव्हा दुष्ट कालचक्रात देश अडकला तेंव्हा  ,तेंव्हा आपल्याच स्वजनांनी बाहेरील शक्तींशी मिळून  षड्यंत्र रचून आघात केले यासं इतिहास  साक्षी  आहे.

जयचंद किवां  आम्मी  ज्यांनी  सिकंदर व मुहमद गौरी  ह्याच्याशी  हात मिळवणी करून भारतावर आक्रमण करण्याचा मार्ग दाखविला . आपल्या  स्वार्थासाठी  जगतसेठ, मीर जाफर, आमिचंद सारखे देशद्रोही व्यक्तीनीच इग्रजाशी हात मिळवणी करून  ह्या देशाला पारतंत्र्यातच्या   खाईत ढकलले.  सरदार बहादूर शोभा  सिंह  जें इंग्रंच्या कामाचे ठेकेदार होतें  त्यांनीच भागत सिंह व त्याच्या साथीदाराची ओळख  पटवून दिली व त्यांना अटक झाली. ही सर्व मंडळी तर आपलीच होती पण स्वार्था पोटी  त्यांनी देशाचे किती न भरून येणारे नुकसान केले हें आपण जाणतोच.



 श्री जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन जें संपूर्ण देश व्यवस्था  परिवर्तन घडवून आणण्याची ,प्रबळ इच्छा जागृत करणाया साठी केले जात होतें .ती क्रांतीची मशाल चिरडून टाकण्यासाठी कपटी राजनारायण व चरणसिंग सारखे  आपलेच लोक होते. ह्या सर्व घटना हेच दर्शवितात कि  आपल्या देशाला  क्षति ग्रस्त अवस्थेत नेणारे दुसरे कुणी  नाहीत तर  आपलीच  माणसे आहेत. 

चिंतेची बाब हि आहे कि आज पण संपूर्ण भारत देश  अश्या एका  कठीण अवस्थेतून जात आहे व आता परिवर्तन  मय क्रांती करण्याची  गरज  असताना  पुन्हा काही कुटील व्यक्तीच्या  कारस्थानामुळे    देश कुठल्या मार्गाने जाईल याची शंका वाटत आहे.







आज किशनराव बाबुराव हाजरे उर्फ आण्णा हजारे संपूर्ण देशा  समोर एक क्रांतीची मशाल हाती घेऊन प्रेरणा  देत आहेत. अन्नाची तुलना गांधीशी केली जाते कारण आण्णा "स्वातंत्र्याची  दुसरीलढाई" सध्या लढत आहेत.आण्णा स्वताहा गांधीवादी आहेतआणि त्यांच्याच  आदेर्शावर  आपली वाटचाल  करीत आहेत.


"गांधी टोपी " जी गांधीजीमुळे  प्रसिद्ध   झाली ती टोपी गांधीजीनी  कधीच घातली नाही पण ती, आण्णा परिधान करतात व आज सर्व देशावासीयाना  पण घालण्यास लावले  व ती त्यांची ओळख बनली.  




काही वेळा असे दिसून आले कि टीम-आण्णा  "आण्णा " ना दुसरे गांधी बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतात पण असे असेल तर ही फार खेदाची व गंभीर बाब आहे.



आण्णाना  " आण्णा" च राहु द्या.............





राजकीय मंडळीनी ज्या प्रकारे आपला स्वार्थ साधण्यासाठी संपूर्ण देशाची व्यवस्थाच भ्रष्ट करून  टाकली ती सरकारी कर्मचारी वर्गाशी  मिलीभगत व साथीने.  जनता जाणते  कि  काही भ्रष्ट लोक देशाला पोखरून टाकीत आहेत. ह्या कारणाने सामन्य जनतेचा संसद आणि त्यातील निर्वाचित सद्श्यावरचा भरोसा राहिला नाही.



.


सर्व जनता भ्रष्टाचाराच्या  खोल अंधकारमय दरीत फसलेल्या अवस्थेत आहेत आणि  आण्णाहजारे ह्यांचे त्या  विरुद्धचे  जन आंदोलन एक ज्वलंत मशाल बनून जनते समोर आले. संपूर्ण देश हा ह्या आंदोलना मुळे संमोहित झाला .







आण्णा हजारे व गांधी ह्याच्यात तुलना करणे बरोबर नाही तरी  ह्या दोघांच्या  व्यक्तीमत्व, व कर्तुत्व ह्याची तुलनात्मक आभ्यास   करण्याचा   प्रयास करू..

 


सार्वजनिक व व्यवसाईक जीवन  


गांधी :--  मोहनदास करमचंद गांधी हे वकील होते त्यांनी इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेला भारत देश सोडून दक्षिण आफ्रिकेत जाऊन आपली वकिली करण्याचा निश्चय केला. भारतीय स्वतंत्रता आंदोलनात ते सामील झाले जेव्हा ते तिथे  श्री गोपाल कृष्ण गोखले यांच्या संपर्कात आले. बराच विचार केल्यानंतर गोखल्याशी संपर्क साधून  भारतीय स्वतंत्रता  आंदोलनात सामील होण्याचा निर्णय घेतला.पुढे लाल-बाल.पाल यांचा जमाना संपल्यावर त्यांनी संपूर्ण देशाचे भ्रमण केले व लोकांशी संपर्क साधला व आपली साधे पणा मुळे ते लोकांत प्रिय झाले.



                                         लाल-बाल.पाल




आण्णा :-- एक अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्मले. किशन बाबुराव हजारे भारतीय सेने मध्ये भर्ती होऊन एक कर्मठ सैनिक बनले.ज्यांनी शत्रू राष्ट्राच्या हल्यात  मृत्यू  जवळून पहिला.  एक गरीब शेतकरी मुलगा सरळ ,साधा  किशनराव ह्या पेक्षा वेगळे ते काय करणार ? 




सैन्यातून  अवकाश प्राप्ती नन्तर  आपले संपूर्ण आयुष  आपल्या गावासाठी वाहिले आणि ती त्यांची कर्म भूमी झाली.  एका मागून  एक छो ट्या  छोट्या  आंदोलना मधून त्यांनी आपल्या गावाची "राळे गण सिद्धी "चा कायापालट केला व आपल्या गावाची ओळख भारतीय नकाशावर उमटवली. 






                                          आन्ना हजारे भारतीय सेनेतिल जवान.


आंदोलनात उतरण्याची कारणे.............


गांधी :--  बर्याच विद्वानाचे मत आहे कि इंग्रजांनी  मोहनदास यांना रेल्वेच्या प्रथम श्रणीच्या डब्यातून धक्के मारून उतरविले नसते तर ते महात्मा झाले नसते.  दक्षिण अफरिकेत त्याचा प्रत्येक वेळी अपमान केला गेला व वकिली पेशेमुळे  दिन दुबळ्या गरीबाच्या  प्रती ते संवेदनशील बनत गेले. मुख्य म्हणजे त्यांना त्यांचा झालेला अपमान सहन झाला नाही त्यात भर पडली ती गरीब लोकांची व्यथा व पिडा  या  कारणाने त्यांनी निश्चय केला  कि इंग्रजी सत्ता उखडून टाकली पाहिजे.




आण्णा:-- आण्णांनी युद्ध काळात मरण फार जवळून पहिले व त्यातून ते वाचले. त्यांना एक नवं जिवन मिळाले पण त्या वेळी  कोणतेही  ध्येय किवां दिशा निश्चित नव्हती. त्यांचे लग्न झाले नव्हते आणि तशी त्यांची इच्छां पण नव्हती. 

सेनेतून अवकाश प्राप्ती नंतर त्याची समोर  कोणतेही ध्येय  नव्हते.त्याच दरम्यान दिल्ली  रेल्वे  स्टेशन वर स्वामी वेवाकानंद लिखित  पुस्तक " Call  to  the youth  for  nation building "  त्याच्या वाचनात आले. त्या पुस्तकातील विविकानंद्च्या विचाराने  प्रेरित होऊन त्यांनी संकल्प केला कि इथून पुढे मी दिन दुबळ्या साठी व राष्ट्र कार्यासाठी माझे जिवन समर्पित करतो. किसन बाबुराव हजारे एक युवा सन्याशी बनले व जनहित कार्यात रत झाले. आण्णा हजारे राष्ट्र भक्त संन्याशी बनून सर्व युवकांचे प्रेरणा स्थान बनले.





 कोणाचा प्रभाव दोघांच्या  विचारधारावर दिसतो........


गांधी :--  गांधीनी आपल्या जिवनात बरीच अध्यात्मिक धर्म ग्रंथांचा आभ्यास केला तसेंच गीतेचेही मर्म जाणून घेण्याचा पर्यंत केला. जें काहीं ते व्यक्तीशः  जिवनात अनुभवले त्यां योगें सत्य शोधण्याचा पर्यंत केला पण अन्तः सर्व धर्म समभाव याचा पुरस्कार केला.  ईश्वर ,अल्ला तेरो नाम या भजनाचा पुरस्कार केला.


 आण्णा :--  आण्णा हजारे सैन्यात २५ वर्षे काढल्यामुळे  आपल्या मोर्च्यावर द्रुढ तेणे  कसे थांबावे हें शिकले. स्वामी विवेकानंद यांचा प्रभावामुळे  त्यांची संकल्प शक्ती द्रुढ झाली. आपल्या गावाची गरिबी अवस्था बघूनच  त्यानां ग्राम कायाकल्प  घडविण्याची  योजना सुचली. 
आण्णा नेहमी सांगतात कि त्यांना गांधी आणि विनोबाजी च्या जीवनातून शिकायला  मिळाले  व  त्या प्रमाणे प्रयोगाला सुरवात केली. 


आण्णा नेहमी आस्थावान राहिले त्यांचा विश्वास आपल्या धर्मावरुन   कधीच  डगमगला  नाही.  गांधी नेहमी जगातील सर्व पंथातील  चागल्या   गोष्टी  कडे लक्ष केंद्रित करीत असत तर आण्णा आपल्या विश्वासावर अधिक द्रुढ राहून इकडे तिकडे भरकटले नाहीत. 


हिदू मुस्लीम सद्भाव जो गांधीना अभिप्रेत होता तो आण्णांनी असा जपाला की कोणीही त्याच्या  कार्याला  सांप्रदायिक रंग देवू शकले नाहीत. 




त्यांनी गावातील  वंचित वर्गास सामाजिक  कार्यक्रमात   बरोबरीने घेऊन अनेक प्रयोग सफल केले. आन्नाच्या सर्व जीवनावर  विवेकानंदाच्या विचारांचा अधिक   प्रभाव पडला  ज्या मुळे ते अलिप्त ,अनासक्त  संन्याशी जिवन जगत आहेत. 




भारत देशास कोणापासून काय मिळाले............

गांधी:----  गांधीनी इग्रजी सत्तेस हलवून सोडले व संपूर्ण देशास एकजूट मजबूत केले. हिंदी-मुस्लीम सद्भावने  साठी त्यांनी आपले आयुष खर्ची  घातले.

जेव्हा  भारतात साम्प्रदाईक  दंगे होत होतें तेव्हां गांधीजी नी सर्व धर्म प्रार्थना  सभा भरविल्या पण त्यांत फक्त हिंदूच सामील  होत होतें. ह्या मुळे सदा सहिष्णू असलेल्या हिंदुनी सेकुलर बनण्याकडे  वाटचाल केली ती गांधीच्या आवाहनावर पण मुस्लीम जनता ह्या पासुन दूरच बघ्याची भूमिका घेत  राहिली.


परिणाम स्वरूप साम्प्रदैक  दंग्या मध्ये  ही  शांतीदूत सेना शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरी कडून यांनाच संपविण्याचा प्रकार घडवीत होते.


गांधीच्या अहिंसा तत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन  प्रयत्नाची  पराकाष्टा करताना दिसत होते. गांधीना आपल्या सहिष्णुता ,  विनम्रता वागणुकीने त्याचे  हृदय परिवर्तन घडवायचे होतें पण या अप्रकृतिक कल्पनेमुळे देशातील दोन समाज विघटीत झाला.त्यांचा "अहिंसा " मार्ग पुढे त्यांच्या नंतर " गांधीवाद" म्हणून जगात प्रसिद्ध झाला.

  आण्णा :--  आण्णा हजारेनी  कधीच राजनीतिक प्रक्रिया मध्ये सक्रीय भाग घेतला नाही. परंतु ग्रामोत्थानच्या रचनात्मक कार्यात कार्यरत राहिले.
आण्णांनी गांधी  सारखे फार देशव्यापी काम केले नाही पण निष्काम भावनेने आपल्या आसपासच्या अभावग्रस्थ समाजाच्या पिडीत लोकांची पिडा नष्ट करण्यासाठी आपल्याला  समर्पण केले.


स्वात्यंत्रकाळा नंतर खर्या अर्थाने गांधीवाद समजला आण्णांच. त्यांनी आपले संपूर्ण जिवन त्यांसाठी खर्ची करीत आहेत. गांधीचे अहिंसा,सहिस्नुता ,सर्व धर्म भाव व गांधीवाद जें स्वता:ला गांधीवादी म्हणवतात ते लोक पण सर्व शिकवण विसरून गेलेत व नुसते त्या नावाने राजकारण करीत आहेत.


ज्या गांधीवादाने  स्वयं गांधीजी काहीही हासील करू शकले नाहीत पण त्याच शस्त्राने आण्णांनी उपोषणं आंदोलने करून सरकारचा अहं चक्काचूर केला. सध्या ज्याला आरक्षण पाहिजे तो रेलरोको,रस्ता रोको, आंदोलने करून मागण्या पदरात पडून घेतो असे चित्र दिसते.


आण्णांनी अडगळिस पडलेला अहिसेचा मार्ग हाताळून पुन्हा एकदा दाखवून दिले कि शांततामय मार्गाने जें साध्य करायचे ते करता येते .









गांधीनी अहिसात्म्क आंदोलने ,उपवास केले पण सर्वच आंदोलने आपले लक्ष गाठू शकले नाही.पण हेचं शस्त्र  आण्णाची ताकद  बनली व भ्रष्टाचार विरुद्धच्या  लढाई मध्ये जनतेचा अफाट पाठींबा मिळाला.






आन्नाच्या पहिल्या जंतर मंतर उपोषणं नंतर देशातील लोक आण्णाना जाणू लागले . त्यांची बाजू सत्याची असल्यामुळे निस्वार्थ बुद्धीने लोकांचे लोकांसाठी चालवलेले आंदोलन पुढे रामलीला मैदानात अफाट  जन समुदायाच्या पाठीब्याने  भारत सरकारला  नमते घ्यावे लागले  आणि आन्नाच्या मागण्या मान्य  कराव्या लागल्या. 






खरें तर बाबा रामदेव यांचे आंदोलन चिरडून टाकण्यात सरकार  यशस्वी झाले  पण तीच चाल आन्नाच्या बाबतीत महागात पडली. आण्णा जवळ ना संपती,ना घर,ना कोठल्याही प्रकारची छुपी धन दौलत आहे .खरें तर त्यांचे जिवन स्वछ निष्कलंक आहे हें जनतेला माहित झाले म्हणून इतका  जनप्रवाह त्यांच्या मागे ठामपणे उभा राहिला  व उद्दिष्ठा पर्यंत पोहचवला .  





भारत सरकारनी अनेक विध पर्यंत केले आण्णांना व त्यांच्या टीमला वेगवेगळ्या कारणांनी बदनाम करण्याचे पण व्यर्थ झाले. आता तर संसदेचा अवमान केल्याच्या कारणावरून आण्णा टीमला नोटीसे पाठविण्यात आली आहेत. ही  एक प्रकारची सूडबुद्धी नाही का ?
संसदेत सर्वच सद्श्यांची वर्तवणूक बघितली तर त्यांना संसदेच्या अवमानाखाली  रोजच नोटीसा द्याव्या लागतील.




अन्नाची खरी अहिसेची परीक्षा होईल जेव्हा एखाध्या  आंदोलना मध्ये आण्णाच्या जीवाचे काही बरे वाईट होईल तेव्हा चालू असलेले आंदोलन अहिसक मार्गाने चालू राहिले तर ती खरी परीक्षा होईल. नाहीतर अहिसावादी गांधी गेल्यानंतर संपूर्ण भारतात जो काही त्यांच्या अनुयायांनी धुमाकूळ घातला तो सर्व श्रुत आहेच.


आजादीची पहिली लढाई १८४७ मध्ये जाहली आणि आत्ता दुसरी लढाई २०११ मध्ये भारतीय जनता हे जाणते  कि देशाच्या मालमत्तेचा विद्व्हंस ,नासधूस करणे योग्य नाही आणि आण्णा नेहमी सांगत असतात कि अहिसा व शांतीपूर्ण आंदोलन चालू ठेवावे. पण त्याच जनते मधले लोक असेही म्हणताना आढळले कि सरकारनी आमचा अंत पाहु नये आम्हाला आन्नाच राहू द्या अन्यथा चंदशेखर,भगत सिंग बनण्यासाठी मजबूर करू नका. अहिसात्मक आंदोलन तसेच चालू द्या नसता इतिहास काही वेगळा लिहिला जाईल.



--------------------------------------------------------------------------------------------------------

छाया चित्रे गूगल इमेजसच्या सौजन्याने. माहिती- संगृहीत (विविध लेख) डाक्टर.मनोज शर्मा.
--------------------------------------------------------------------------------------------------------

प्रतक्रिया :----

श्री. बासरकरसाहेब: नमस्कार:
श्री. अण्णा हजारेंवरचा लेख अप्रतिम आहे. विशेषत: त्यांची गांधींशी केलेली तुलना डोळ्यांत अंजन घालणारी अशी आहे. आपल्या भारताच्या ईतिहासाची एक नविनच घडण घडते आहे. ह्या नविन पर्वाचे आपण साक्षीदार आहोत हे आपले भाग्य!
एक ऊत्तम लेख रसिकांच्या समोर आणल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन!
शशिकांत पानट
Los Angeles

०९/१४/२०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: