shashi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
shashi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १५ एप्रिल, २०१६

एका युनिव्हरसिटीची गोष्ट




कदाचित ही गोष्ट आपण आधी ऐकली अथवा वाचलीही असेल.
आपल्या अंतर्यामी दडलेल्या अहंकारामुळे कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीचे मुल्यमापन कारायला संपुर्णत: चुकत असतो त्याचे हे एक उदाहरणच म्हणावे लागेल.

ही गोष्ट आहे जगप्रसिद्ध अशा हार्वर्ड युनिव्हरसिटीत (विश्वविद्द्यापीठांत) घडलेल्या एका घटनेची!







                                                            हार्वर्ड युनिव्हरसिटी




त्या दिवशीही विश्वविद्द्यापीठांत नेहमीप्रमाणे जोरदार काम चालु होते. विद्द्यार्थ्यांची नांवे नोंदविणे, त्यांची फी जमा करणे, प्राध्यापकांची नेमणुक करणे, अशा एक ना अनेक कामांमध्ये ते विद्द्यापीठ नेहमीप्रमाणेच मग्न होते! युनिव्हरसिटीच्या प्रेसिडॆंटच्या कार्यालयांत रोजचा दिनक्रम चालु होता, पण फार धांवपळ निदान त्यादिवशी तरी नव्हती!






तेव्हढ्यांत कार्यालयाचे दार लोटुन एक करडा ड्रेस घातलेली, मितभाषी स्त्री आपल्या नव-यासहित प्रेसिडेंटच्या कार्यालयांत शिरली. समोर सेक्रेटरीबाई आपाल्या कामांत दंग होत्या. आता कोण तडमडायला आलं आहे अशा त्रासिक चेह-याने सेक्रेटरीने त्या जोडप्याकडे पाहिले. प्रथमदर्शनीच सेक्रेटरीच्या मनांत पहिला विचार आलो तो म्हणजे की ही खेडवळ वाटणारी जोडप्याची ब्याद कशाला बरे ह्या आधुनिक विश्वविद्द्यालयांत आली असावी? अशा मंडळींचा इथे काय संबंध? 

तेव्हढ्यांत त्या स्त्रीएबरोबर आलेला गृहस्थ अतिशय नम्रपणाने सेक्रेटरीला म्हणाला: "नमस्कार, आम्हा ऊभयतांना प्रेसिडॆंटला भेटायचे आहे"

"प्रेसिडॆंटला? तुम्ही त्यांची भेटायसाठी अपाईंटमेंट घेतली आहे कां?"

त्या गृहस्थाच्या नकारार्थी मान हलविण्याकडे लक्षही न देतां सेक्रेटरी तुटकपणे म्हणाली: " प्रेसिडॆंट पुर्ण दिवस खुप बीझी असतील"

"कांही हरकत नाही, आम्ही थांबु की त्यांच्यासाठी त्यांना दोन मिनिटे वेळ मिळेपर्यंत!"

तो गृहस्थ आणि ती स्त्री कोणतीही तक्रार न करतां वेटींगरूममध्ये शांतपणे वाट पाहात बसली!

सेक्रेटरीने देखील फारसे लक्ष दिले नाही. मनांत म्हणाली: "बसा हं वाट पाहात! बघु या किती वेळ थांबता ते!"

त्यानंतर कांही तास निघुन गेले. ते जोडपं तक्रार करेल आणि मग आपण त्यांना "अपाईंटशिवाय आलं ना, की हे असं होतं बर का?" असं लेक्चर मारुन घरी पाठवू असा विचार करीत त्या सेक्रेटरीने देखील त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही!

ते जोडपं मात्र शांतपणे बसुन वाट पहात होतं! आता मात्र सेक्रेटरीबाईला अजिबात राहावलं नाही! ही माणसं तक्रार करीत नाही तरी यांना किती वेळ बसु द्यायचं? ही ब्याद एकदाची इथुन घालविलेली बरी म्हणुन ती शेवटी प्रेसिडेंटच्या कार्यालयांत गेली आणि त्यांना म्हणाली: "सर, हे एक जोडपं गेले कांही तास तुम्हाला भेटायचं म्हणुन थांबले आहेत. तुम्ही जरा त्यांच्याशी दोन मिनिटं बोलतां कां? म्हणजे ते इथुन टळतील तरी एकदाचे?"





प्रेसिडेंटसाहेबांनी चेह-यावर उसने हास्य आणलं आणि आपला कोट सांवरीत ते बाहेर आले. त्या जोडप्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं नि म्हणाले: "हं बोला! मी काय करु शकतो आपल्यासाठी?"

ते जोडपं मोठ्या अदबीने ऊभे राहिलं! त्यांनी कमरेत वाकुन नमस्कार केला आणि ती स्त्री नम्र आवाजांत त्यांना म्हणाली: "आपण एव्हढे बिझी असुनही आम्हाला भेटायला आलांत त्याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद!"

"हो पण आपलं काय काम होतं माझ्याकडॆ?" आवाजातली नाराजी कितीही न दाखविण्याचा यत्न केला तरी ती स्पष्टपणे ऊमटली होती त्यांच्या बोलण्यांत!

ती स्त्री  परत एकदा अति नम्रतेने म्हणाली: " आमचा मुलगा या विश्वविद्द्यालयांत एक वर्ष शिकला, त्याला हे विद्द्यालय खुप आवडायचे! दुर्दैवाने एक वर्षापुर्वी तो एका अपघातामध्ये दगावला, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्हाला ह्या विद्द्यालयांत शक्य असल्यास  ह्याच कॅंपसवर काहीतरी मेमोरियल बसवायचे आहे"

हे सारे ऐकुन प्रेसिडेंटच्या मनावर फारसा परिणाम झाला आहे असे कांही वाटले नाही. ते कांहीशा कोरडेपणानेच म्हणाले:" मॅडम, अहो ते कसं शक्य आहे? अहो इथे हजारो विद्द्यार्थी शिकतात, त्यांतल्या अशा प्रकारच्या विद्द्यार्थ्यांच्या नांवे आम्ही जर पुतळे ऊभारीत बसलो तर ह्या विद्द्यालयाचे रुपांतर एखाद्या स्मशाभुमीमध्ये व्हायला अजिबात वेळ लागणार नाही! छःए छे ते कांही शक्य होणार नाही! या अपण आता!"

ईतक्या वेळ शांतपणे हे संभाषण ऐकत असलेल्या त्या गृहस्थास कांहीतरी म्हणायचे होते, तेव्हढ्यांत ती स्त्री परत प्रेसिडेंटला म्हणाली: "नाही नाही, आपला कांही तरी गैरसमज होतोय! आम्ही पुतळा वगैरे बसवा म्हणुन सांगत नाही तर आमच्या मुलाच्या नांवे एखादी ईमारत विद्द्यालयास द्यावी असा विचार करतोय!"

ते ऐकतांच प्रेसिडेंटने डोळे फिरविले. आपल्या नुकत्याच घातलेल्या नव्या को-या सुटावरुन हात फिरवित पण वैतागलेल्या स्वरांत तो म्हणाला:" अहो निदान नीट विचार करुन तरी बोला. ईमारत विद्द्यालयाला द्यायची म्हणतां? तुम्हाला कल्पना तरी आहे का एका इमारतीसाठी किती पैसे लागतात त्याची की ऊचलली जीभ आणि लावली टाळ्याला?" खिच्यातुन एक पोर्टेबल कॅलकुटर काढुन त्यावर आंकडे टाकीत प्रेसिडेंट पुढे म्हणाला:" अहो सध्या आमच्या हार्वर्ड कॅंपसवर असलेल्या इमारतींचीच किंमत साडेसात मिलियन डॉलर्स आहे!"

आता एव्हढी आंकडेवारी दिल्यावर तरी ह्या जोडप्याचा आवाज नक्कीच बंद होईल अशी त्याची खात्री होती.
ते सारे ऐकुन ती स्त्री थोडा विचार करीत आपल्या नव-यास म्हणाली:" अहो, एव्हढ्या मोठ्या कॅंपसमधल्या इमारतींची किंमत फक्त साडेसात मिलियन डॉलर्स? असं असेल तर मग आपणच कां एखादी युनिव्हरसिटी सुरु करु नये?"

तिच्या नव-याने संमतीदर्शक मान हलविली. तो प्रेसिडेंट फक्त पाहातच राहिला. मनांत म्हणाला: " ही बाई सांगते काय आणि हा माणुस हो म्हणतोय काय? काय हा वेड्यांचा बाजार? जाऊंदे, ह्यांच्या नादी न लागलेलच बरं!"

ते जोडपं प्रेसिडेंटचे धन्यवाद मानुन जायला निघाले! ती सेक्रेटरी धांवत आली नि म्हणाली: "अहो, जाण्यापुर्वी आमच्या व्हिजीटर बूकमध्ये नांव आणि सही कारायला विसरु नका! आम्हाला रेकॉर्ड ठेवावं लागतं म्हटलं!"

संमतीदर्शक माना हलुऊन दोघांनीही सह्या केल्या: मिस्टर ॲन्ड मिसेस लेलॅंड स्टॅनफोर्ड.




                                                                         
                                 मिस्टर ॲन्ड मिसेस लेलॅंड स्टॅनफोर्ड.



दोघांनी दाराबाहेर पावलं टाकली आणि पार्किंग एरियामधल्या आपल्या गाडीपर्यंत चालत जायच्या वेळेत कॅलीफोर्निया राज्यांतल्या पालो आल्टो ह्या शहरामधली जागा त्यांच्या विश्वविद्द्यालयासाठी "स्टॅनफोर्ड युनिव्हरसिटी" हे नांव देऊन मुक्रर देखील केली!  











माणसाच्या बाह्यरुपावरुन त्याच्याविषयी पुर्वदुषितग्रह करुन    घेणा-या अहंकाराला वास्तविकपणे कुणाच्याच आयुष्यांत स्थान असु नये! मात्र कधी कधी असंही वाटतं की त्या सेक्रेटरीच्या अशा स्वभावदोषामुळेच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या मदत होऊन या जगप्रसिद्ध अशा विश्वविद्द्यालयाचा जन्म झाला नाही का? जे होते ते ब-यासाठीच म्हणायचे!







=================================================


स्टॅनफोर्ड युनिव्हरसिटी एका मुळ ईंग्रजी कथेचे स्वैर भाषांतर
शशिकांत पानट

यांतील  चित्रे गुगल  च्या सौजन्याने 







सोमवार, ५ ऑक्टोबर, २०१५

डॉ . अब्दुल कलाम यांनी दिनांक मार्च १२, २०१४ ला भारतीयांना लिहिलेले खुले पत्र………. !!



आपले सर्वांचे लाडके '" मिसाईल म्यान "' माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल  कलाम आपली इहलोकीची यात्रा संपवुन परलोकस्थ झाले . सर्व लहान थोर भारतीयाना वाईट वाटले . प्रत्येकांनी त्याना आपल्या परीने श्रद्धांजली वाहिली . एक वर्ष अगोदर त्यांनी भारतीयांना कळकळीचे पत्र लिहुन सर्वाना आपल्या कर्तव्याची जाणीव करुन दिली . ह्या इंग्रजी पत्राचे आमचे मित्र शशी पानट ( अमेरिका ) ह्यांनी अनुवाद करून श्रद्धांजली वाहिली . 











आपल्याकडील मीडिया  इतक नकारार्थी कां  असते ? आपण भारतीय आपली शक्ती आणि कर्तुत्व ओळखण्यांत लाज कां बाळगतो ?खर तर आपला देश किती महान आहे .!
आपल्या लोकांना आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या कितीतरी यश-गाथा आहेत. पण त्या मनः पुर्वक स्वीकारायला नकार देतो कां ? 
दुध उत्पादनात आपण जगात पहिले आहोत , Remote  sensing satellites मध्ये आपण पहिला क्रमांक पटकावला आहे. गव्हाच्या उत्पादनात आपण जगात दुसर्या क्रमाकावर आहोत. तांदळाच्या उत्पादनात आपण पण जागतिक क्रमाक दुसरा आहे. 
आता डॉ . सुदर्शन सारख्या भारतीयांनी एका छोट्या खेडे गावाला स्वतःच्या पायावर उभे करून ,स्वावलंबी करून, त्यांचा कायापालट करून टाकला . या अश्या अनेक ,लाखो यशोगाथा आपल्याकडे असतांना आपला मिडिया मात्र वाईट बातम्या, अनर्थ , आरीष्ट , अपघात आणि दिवाळखोरीच्या बातम्यांनी ग्रासला गेला आहे.

काही दिवसापूर्वी मी तेल-अव्हिव मध्ये होतो आणि तिथे असताना एक वर्तमानपत्र वाचीत होतो. त्याच्या आदल्याच दिवशी बॉम्बिंग सारखा मोठा  अनर्थ घडून गेला व बरीच मनुष्यहानी झाली होती . हमासचे  युद्ध चालू होते. असे असतानाही वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर मात्र तिथल्या एका सद्गृहस्थाने आपल्या नापीक वाळवंटासारख्या शेतीवर कामं करून गेल्या पांच वर्षात कसे हिरवेगार नंदनवन केले ह्याचे समग्र वर्णन आणि फोटो छापले होते. ह्या उतेजानात्मक बातमीच्या वाचनाने त्या शहराला जाग आली होती . अर्थात आदल्या दिवशीच्या बॉम्बिंग आणि युद्धाच्या बातम्या ,किती माणसे पडली आहेत, वगैरे सरा मजकूर वर्तमानपत्राच्या आंतल्या पानावर इतर बातम्याच्या आड दडलेला  होता . 
भारतांत आपण आजारपण,मरण, एकमेकावर झालेले हल्ले , गुन्हे, ह्याच बातम्या पुरवीत असतो ,वाचत असतो.आपण इतके नकारार्थी कां वागतो ?दुसरा प्रश्न ,आपण सारे भारतीय परदेशाच्या इतक्या आकर्षणात कसे काय गुरफटत आहोत. ? 
आपल्याला परदेशी टिव्ही पाहिजे, सदरे पाहिजे, तंत्रज्ञान पाहिजे, हे इथर देशामधून आयातीच्या कल्पनेने आपले मन असे व्यापुन  का जाते ? एवढे आकर्षण का ?
तुम्हाला कल्पना नाही का कि स्वतःबद्दलचा मान सन्मान हा स्वतःला ओळखल्यानेच प्राप्त होतो. 
मी हैदराबादला एका भाषणासाठी गेलो होतो. त्याठिकाणी एका चौदा वर्षाच्या लहान मुलीने माझी स्वाक्षरी मागितली . मी तिला विचारले " तुझ्या आयुष्याचे ध्येय काय ( बेटा ) "? तिने तात्काळ उत्तर दिले " मला सुधारलेल्या भारतात राहायचे आहे " 
तुम्हाला आणि मला तिच्यासाठी आपल्या भारतांत सुधारणा करायच्या आहेत. 
तुम्ही जाहीरपणे सांगायला पाहिजे, घोषणा द्यायला पाहिजेत, " भारत हा सुधारणेच्या मार्गावरचा देश नाही, तर खूप सुधारलेला देश आहे. "
तुम्ही म्हणता  की आपले सरकार कार्यक्षम नाही 
तुम्ही म्हणता की आपले कायदे फार जुने झालेत . 
तुम्ही म्हणता की मुनिसिपालटी  कचरा साफ करीत नाही .
तुम्ही म्हणता की फोन चालत नाही, रेल्वे एक जोकच आहे, आपली एअर लाईन ही  जगांतील घाणेरडी एअर लाईन आहे , पोस्टांत टाकलेले पत्र ठिकाणावर कधीच पोहोचत नाही . 
तुम्ही म्हणता आपला देश कुत्र्याचे जीणे जगतो आहे आणि सर्व  देश म्हणजे एक गोठा झाला आहे . 
तुम्ही म्हणता , म्हणत राहता ……. 
अरे पण ह्या सगळ्यासाठी तुम्ही काय करतां  ?

सिंगापूरला जाणारे तुम्ही आहात अशी कल्पना करा . तुमचे नाव त्या व्यक्तीला द्या , तुमचा चेहरा त्या व्यक्तीचा असेल ,मग तुम्ही सिंगापूरला पोहोचून विमानतळाच्या बाहेत येतां , आणि काय आश्चर्य तुम्ही तुमच्या आंतरराष्ट्रीय वागणुकीचा मुखवटा पटकन चढवता. 
सिंगापूरला तुम्ही सिगारेचे थोटूक रस्त्यावर फेकीत नाही , किवा स्टोरमध्ये काहीतरी खात उभे राहत नाही. सिंगापूरच्या नागरिकाना जेव्हढा अभिमान तिथल्या रेल्वेचा वाटतो तेव्हढा ( किंबहु अधिकच ) तुम्हाला वाटतो . 
तिथल्या सुप्रसिद्ध ओचार्ड रोडवर संध्याकाळी ५ ते ८ दरम्यान प्रवास करण्यासाठी तुम्ही ५ डॉलरचे तिकीट सहज घेता . मग तुम्ही पार्किंग लॉट मध्ये येवुन तुमचे तिकीट पंच करतां .तिथल्या दुकानांत  किवा रेस्टारंटमधे  अधिक वेळ घालविला तर वर लागणारे पार्किंगचे पैसे मुकाट्याने भारतां . तुम्ही तिथे कांही तक्रार करता,नाही ना ?
रमादान चालु असताना दुबई सारख्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांसमोर 

( भर रस्त्यात ) काही खाता  कां ? नाही नां ?

जेड्डाच्या रस्त्यावर तुमच्या डोक्यावर वस्त्र ( रुमाल बांधलेला ) नाही अश्या स्थितीत जातां का तुम्ही ? नाही ना ?
लंडनमध्ये " माझे ISD  किवा STD चे बिल दुसर्याच्या अकौंट मध्ये जाऊदे त्यासाठी हे घे महिन्याला १० पौंड " अशी लाच तुम्ही देऊ शकता का ? देतां कां ? नाही ना ?
वाशिंग्टनमघे  स्पीडलिमिटच्यावर गेलात आणि पोलिसाने पकडले तर " तुला माहित आहे मी कोण आहे ते ? मी अमक्या तमक्याचा मुलगा आहे. चल घे हे १० डॉलर्स अन जाऊदे मला  " असे म्हणण्याची प्राज्ञा आहे कां ?
ओस्ट्रेलिया अथवा न्युझिलंड मध्ये नारळ फोडला तर कचरा पेटीत न टाकता भलतीकडेच टाकण्याचे धर्य तुम्ही दाखवु शकाल का ? नाही नां ?
टोकियोच्या रस्त्यावर पान खाऊन तुम्ही कां थुंकत नाही ? किवां  बॉस्टन रस्त्यावर तुम्ही खोटे सर्टीफिकेट कां  खरेदी करीत नाहीत ? 
होय आपण अजुनही तुमच्या बद्दल बोलतो आहोत …। 
हो तुम्हीच जे परदेशाच्या नियमांचे पालन स्वेच्छेने करता पण स्वदेशाचे नियम मात्र पायदळी तुडविता . 
भारताच्या विमानतळावर ऊतरता न ऊतरता तोच तुम्ही, हो तुम्हीच सिगारेटचे थोटूक , कागदाचे कापटे , हे वाट्टेल तीथे फेकतां परदेशाच्या भूमीवर त्यांचे नियम पाळणारे, तिथे कायद्याच्या चौकटीत चालणारे, त्यांच्या स्वछेतेचे कौतुक करणारे, तुम्ही आपल्या मायदेशाच्या भुमीला पाय लागताच कां बदलतां एवढे ? तुम्ही तसे कां  वागत नाही ईथे?
अमेरिकेत प्रत्येक कुत्र्याच्या मालकाला कुत्र्याने केलेली घाण स्वतःलाच आवरावी लागते, जपान मघ्ये ही तेच , भारतीय नागरिक तसे करतील कां इथे ? 
आपण फक्त निवडणुकीच्या वेळी सरकार निवडण्यासाठी पुढे सरसावतो आणि नंतर आपली जवाबदारी झटकून मोकळे होतो. त्यानंतर मात्र आपण सरकार आपली सर्व प्रकारे सेवा करेल अश्या भ्रमांत राहतो , आराम करतो . त्यांना कोणतीही मदत तर सोडाच पण सारखा नकारार्थी हातभार मात्र नित्य नियमाने सतत आपण  लावितच असतो . 
सरकारने सर्व माफ करावे अशी अपेक्षा आपण ठेवतो ,मात्र सारीकडे पसरलेल्या कचऱ्यातला थोडा भागही उचलण्यासाठी अथवा साफ करण्यासाठी थांबायला आपल्याकडे वेळ नसतो .कारण तुमच्या मते ते काम दुसऱ्या कुणाचे असते , तुमचे नव्हे ! किंबहुना कागदाचा एखादा कपटाही  उचलुन कचऱ्याच्या पेटीत टाकावा असे आपल्या मनात देखील येत नाही . रेल्वेमधील संडास त्यांनी नेहमी स्वच्छ ठेवावे ह्या अपेक्षेबरोबरच तो साफ ठेवण्याचे उत्तरदायित्व आपलेही आहे हे आपल्याला कधीच आठवत नाही . 
भारतीय विमानसेवा अर्थात एअर इंडीया आणि खाजगी विमानसेवा कंपन्यांनी चांगली उत्तम जेवण द्यावे , उत्तम टॉयलेटची व्यवस्था करावी अश्या अप्र्क्षा आपण ठेवतो मात्र  जमले तर  एखादी भुरटी चोरी देखील करायला आपण मागेपुढे  नाही . दुर्दव्याने  हा नियम अशा प्रकारची उत्तम सेवा न देणाऱ्या त्यांच्या नौकर वर्गालाही लागू आहे. 
समाजात असलेल्या अत्यंत ज्वलंत प्रश्नांना ,मग ते स्त्रियांविषयी असोत  ,हुंड्याच्या बाबतीत असो   मुलगी झाली म्हणून असो आपण मोठ मोठ्या घोषणा देऊन निषेध व्यक्त करतो पण तेच आपण घरी गेल्यावर मात्र मुग गीळून स्वस्थ बसतो . तिथे तुम्ही नेमके विरुद्ध वागता . 
काय आहे आपले समर्थन ? कोणती करणे आहेत अशी की ज्यामुळे आपण असे वागतो ?
" अरे हा बद्दल होण्यासाठी संपूर्ण सिस्टमच बदलायला पाहिजे . मी एकट्याने बदलुन  काय मोठासा फरक पडणार आहे ? "
मग कोण बदलणार हि सिस्टम ?आणि असत तरी काय ह्या सिस्टममध्ये ?
ह्यामध्ये असतात आपले शेजारी, घरातली ईतर माणसे,इतर शहरे आणि गावे , इतर समाज आणि हो, सरकार देखील ,फक्त त्यामध्ये "मी " आणि " तुम्ही " नसता . हो ना ?
जेव्हा सकारात्मक असा कोणताही बदल घडविण्यासाठी ह्या सिस्टीम मध्ये   योगदान दयायचे असते तेव्हा आपण सार्वजण आपल्या कुटुंबासहित स्वतःला एका कोषांत बंद करून घेतो आणि दूरवर असलेल्या देशांकडे असाहयतेने  पाहत असतो , कोणी तरी मिस्टर क्लीनयेईल ,आणि अशीकाही जादूची कांडी फिरवेल की त्याच्या एका फटकाऱ्याने सारे  काही व्यवस्थित होईल अशा भ्रमात राहतो . तेही जमले नाही तर आम्ही आमचा देशच सोडतो ,आणि एखाद्या भयभित  षंढासारखे पळत सुटतो ,अमेरिकेसारख्या देशांत जातो त्यांच्या ऐश्वर्याची ,त्यांच्या सिस्टमची पोटभरून स्तुती करतो आणि त्यांच्या ऐश्वर्याच्या वाढीसाठी कष्ट करीत राहतो ,आणि न्युयार्काला काही अघटीत घडले की आम्ही इंग्लंड पोहोचतो, इंग्लंडला काम मिळाले नाही तर विमानाने गल्फला जातो, गल्फच्या  अडकलो तर आम्ही भारत सरकारने आम्हाला सोडविले पाहिजे ही मागणी कंठशोष करून आणि सर्व जगाला ऐकु जाईल एवढ्याने  बोंबलतो !!
सगळेचजण नाजायत  फायदा घ्यायला टपलेले आहेत आणि भारतावर बलात्कार करताहेत. सिस्टिमसाठी वा ती चांगली होण्यासाठी कुणीही योगदान करीत नाही , आपली सद्दविवेक बुद्धी आपण पैशाकडे गहाण टाकली आहे . 
प्रिय भारतीयांनो  हे पत्र मी मुद्दामच लिहिले आहे ,ह्यामधून विचारप्रवर्तक असे आत्मनिरीक्षण व्हावे आणि आपल्या सद्द्विवेक बुद्धीला आव्हान दयावे हाच उद्देश आहे. 
शेवटी मी जे, एफ, केनेडी ह्यांनी अमेरिकन नागरिकाना दिलेला संदेश जसा होता तसेच आवाहन आपणां सर्वाना करतो …. 
"  आपण भारतासाठी काय करू शकु , काय करायला पाहिजे ह्याचा विचार करा ,कि जेणे करून  आपला भारत आज अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश आहेत तसा घडु शकेल  "
भारताला आपल्याकडुन काय हवे ते आपण करु या !!!
धन्यवाद 
आपला ,
डॉक्टर अब्दुल कलाम 




------------------------------------------------------------------------------

 अनुवादक ----शशिकांत पानट 

छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने .

 




 


शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

क्षण.......!!


क्षण!


एकदा एक माणुस मेला. आपण अगदी अकाली मेलो आहोत असेच त्याला वाटत होते. खरं तर अजुन खुप कांही गोष्टी करायच्या राहिल्या होत्या. पण आता आपण जीवंतच नाही असं लक्षांत आल्यानंतर त्याचा नाईलाजच झाला. मात्र आता वर स्वर्गांत पोहोचलो आणि ईश्वराला भेटलो की "माझा असा अकाली मृत्यु कां झाला" हे आपण त्याला नक्की विचारायचेच असं त्यानं ठरविलं. आणी काय आश्चर्य! समोरुन देवच येतांना दिसला. त्याच्या हातांत एक मोठी बॅगदेखील होती. त्यांत काय असावे बरे? असा विचार करेपर्यंत देव समोर येवुन ठाकला. आणि माणसाला म्हणाला: "चल, तुझा येथला मुक्काम संपला. आता माझ्याबरोबर चल" त्या माणसाला थोडा धक्काच बसला कारण देवाला प्रश्न विचारण्याच्या आंतच देवाने आधीच मुद्द्यालाच हात घातला होता. पण वाद घालणार नाही तो माणुस कसला? माणुस देवाला म्हणाला:
"पण देवा, ईतक्या लवकर? अजुन खुप कांहीतरी करायचे माझे बेत आहेत."
देव तिकडे दुर्लक्ष करुन परत म्हणाला "हे, बघ, तुझ्या पृथ्वीवरील मुक्कामाची वेळ संपली आहे, चल, निघायला हवं" माणुस एक क्षणभर विसावला आणि त्याने विचारले" ठीक आहे देवा, पण एक विनंती आहे. मला जाणुन घ्यायची खुप उत्सुकता आहे की तुझ्या हातांत जी बॅग आहे त्यांत काय आहे? देव किंचित हंसला आणि म्हणाला:
"अरे त्यांत तुझ्याच चीजवस्तु आहेत."
माणूस: "काय माझ्या चीज वस्तु? म्हणजे माझे कपडे? पैसे? महत्वाचे कागदपत्र?"
देव: "अरे त्या वस्तु तुझ्या कधीच नव्हत्या, त्या पृथ्वीवरच्या होत्या"
माणूस: "मग, माझ्या आठवणी नक्की असतील त्यांत"
देव: "आठवणी? छे, त्या तुझ्या कधीच नव्हत्या. त्यावर वेळेची मालकी होती."
माणूस: "हां, हां, आता आठवलं! मला अगदी खात्रीनं वाटतं की माझी बुद्धीमत्ता आहे त्यांत?"
देव: "बुद्धीमत्ता? छे रे, बुद्धीमत्ता तर आपल्या सभोवतालच्या परिस्थिती -प्रमाणे आपण वापरतो त्यामुळे ती तुझ्या मालकीची कधीच नव्हती!" आता मात्र माणुस थोडा विचारांत पडला. पण त्या बॅगमध्ये काय आहे ह्याची ऊत्सुकता त्याला स्वस्थ बसु देईना, त्याचे प्रश्न विचारणे थांबलेच नाही.
माणुस: "अच्छा, तर मग त्यांत नक्की माझी मित्र मंडळी आणि कुटूंबीय असणार"
देव: "पृथ्वीवरील मुक्कामांत मित्र आणि कुटूंबीय तुला तुझ्या आयुष्याच्या मार्गावर भेटले, त्यांच्यावर त्या मार्गाची मालकी आहे तुझी नव्हे, ते कसे असतील बरे ह्यांत?"
माणूस: "नसु देत मित्र आणि कुटूंबीय. पण माझ्या आयुष्यभर ज्यांनी साथ दिली, ते म्हणजे माझी पत्नी आणि मुलगा त्या बॅगेमध्ये नक्कीच असायला पाहिजे"
देव: "तुझा विचार मी समजु शकतो, पण अरे ते देखील तुझे कधीच नव्हते, ते तुझ्या हृदयाच्या मालकीचे आहेत"
माणुस: "मग काय बरं असेल त्यांत? आता काय बरं ऊरलं? माझे शरीर?"
देव: "तुझे शरीर? अरे तेही तुझ्या मालकीचे कधीच नव्हते. ते तर केव्हांच आपल्या माहेरी गेलं आहे आणि पृथ्वीवरच्या मातीत विलीन झालं आहे. त्यावर त्या पृथ्वीवरच्या मातीची, धुळीची मालकी आहे."
माणुस: "हां, आत्ता फक्त एकच गोष्ट ऊरली आहे. आणि हे ऊत्तर बरोबर आहे असं मला वाटतं. त्यांत माझा आत्मा असेल"
देव: (किंचित स्मितहास्य करीत) )"तुझा आत्मा? अरे तो तर माझ्या मालकीचा आहे"
आता मात्र माणुस घाबरला. त्याची ऊत्सुकता पराकोटीला पोहोचली. आतां ह्यांत आहे तरी काय? असा विचार करीत घाबरत घाबरत त्याने देवाच्या हांतांतुन ती बॅग घाईघाईने घेतली आणि ऊघडली. पहातो ते काय? ती तर एकदम रिकामीच होती. त्याच्या डोळ्यांमधुन अश्रु ओघळु लागले. रडत रडत तो देवाला म्हणाला: "माझं संपुर्ण आयुष्य पृथ्वीवर गेलं, आणि माझ्याकडे कांहीच नव्हतं?"
देव म्हणाला: "अरे फक्त तुच नाही, कोणत्याही माणसाकडे कधीही कांहीही नसतं, तु पृथ्वीवर जन्माला आला तेव्हां रिकाम्या हाताने आलास, तुझं शरीर, तेही तुला तुझ्या आई वडीलांनी दिलं होतं. आता पृथ्वीवरुन जातांना देखील ते शरीर तुला तिथेच सोडून जावं लागतय! मात्र एक गोष्ट तुझ्याकडे नक्की आहे!"
माणसाचे डोळे चमकले. त्यांत एक आशेचा किरण दिसु लागला. मोठ्या अधिरतेने आणि ऊत्सुकतेने देवाला विचारले: " देवा, अरे, मी तुला एव्हढे प्रश्न विचारले त्यांतले एकही माझे नव्हते. मी काय बरं विचारायचं विसरलो तुला? असं आहे तरी काय माझ्याकडे?"
देव ऊत्तरला: "अरे तुझ्याकडे एकच गोष्ट नेहमी होती आणि ती म्हणजे आत्ताचा क्षण! तो तर नेहमी तुझ्याकडेच होता आणि तेव्हढीच एक गोष्ट तुझ्याकडॆ नेहमी असणार! म्हणुनच आला क्षण भाग्याचा असं म्हणतात! आयुष्य हे क्षणभंगुर आहे असंही म्हणतात. आहे तो क्षण कसा जगावा ह्याचा विसर माणसाला पडतो, आणि जे आपल्या मालकीचच नाही त्याच्या मागे तो नेहमी लागतो. शेवटी हातांत कांही येतच नाही. चल, आत्ताच्या ह्या क्षणाने भरलेली बॅग तु घे आणि माझ्याबरोबर पुढच्या प्रवासास सिद्ध हो!"
ईतकी वर्षे आयुष्याचा प्रवास करुनही आपल्याला हे साधे गणित कळले नाही ह्याचे त्या माणसाला खुप वाईट वाटले. त्याचे मन विषण्ण झाले. त्याने मान खाली घातली, आपली बॅग ऊचलली आणि हे साधं सत्य आपल्याला आख्या आयुष्यभर कसं कळलं नाही ह्या विचारांत मग्न होत तो देवामागुन चालु लागला! स्वर्गांत जरी तो चालत होता तरी पृथ्वीवर कुणीतरी म्हणत असलेल्या गीताचे शब्द आणि सूर त्याच्या कानावर पडत होते. डोळ्यांतुन सतत चाललेल्या अश्रुधारांमधुन स्वर्गाचा तो सुशोभित मार्ग त्याला अंधुक अंधुकच दिसत होता.


संपला इथला पाहुणचार
चार दिसांच्या मुक्कामाचा
सरला रे व्यवहार!! ध्रु!!

येथे उरतील सगे सोबती
आठवणीही येतील नेत्री
शोधीत बसतील तत्वज्ञानी
जीवनाचे रे सार!!!! ध्रु!!

चक्र कालचे आज चालते
नविन येथे काही नसते
आज तुझे रे दिवस संपले
मुक्कामाचे चार !!!! ध्रु!!

आला तेव्हां काय आणिले?
जातां इथले, इथे राहिले
अवनीवरच्या मुक्कामाचा
आज पूर्ण व्यवहार!!!!ध्रु!!


लेखक -----
शशिकांत पानट