शुक्रवार, २७ जून, २०१४

हे घडेल का महाराष्ट्रात?




झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते,थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापूर्वी भरून राहिलेलं एक निशब्द जग. अहमदाबादला उतरतोघ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायचं असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजूनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्रकन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डींग्ज नाहीत की सकाळी सकाळी त्यांच्या मुंडक्यांचे फोटो पाहावे लागतील. मोदींचेही कुठे होर्डींग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम. 




        
  अहमदाबाद कुठं संपतं आणि कुठं गांधीनगर सुरु होतं हे लक्षात येत नाही. पण गाडी चकाचक रस्त्यांना लागलीट्रॅफिकचे साईन बोर्ड सगळे जिथल्या तिथं दिसले,थोडीशी झाडी दिसायला लागलीस्वच्छ चौपदरी रस्ता लागला की आपण गांधीनगरमध्ये असल्याचं ओळखायचं. माझी आणखी एक खूण. गाडीनं नर्मदेचा पाण्यानं भरलेला कॅनॉल ओलांडला की गांधीनगरमध्ये पोहोचल्याची पक्की खू पटते. मला ही जास्त जवळची वाटतेकारण हे शांतपणे वाहणारं पाणी सातपुड्याच्या डोंगरात पडलेलं असेल ज्यानं गुजरात समृद्ध होतोय.
       



 गांधीनगर हे राजधानीचं शहर. पण गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादच. सगळे बाजारव्यवहार अहमदाबादमध्येच. काही मोठी खरेदी करायची झाली तरी गांधीनगरहून अहमदाबादलाच आलेलं बरं. २० किलोमीटर पाऊणतासाचा रस्ता. अहमदाबाद-गांधीनगर म्हणजे दोन जुळी शहरं. सिकंदराबाद-हैदराबाद किंवा पुणे-पिंपरी चिंचवडसारखी.





        
जसे अहमदाबादमध्ये कुठल्या पक्षाचे पोस्टर्स दिसत नाहीत तसे गांधीनगरमध्येही नाहीत. ना काँग्रेसना भाजपाना नरेंद्र मोदी. गेल्या तीन एक महिन्यांपासून माझी कधी महिन्याला तर कधी पंधरा दिवसाला मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर अशी फेरी असते. होत राहतील आमचं एक घर सध्या गांधीनगरला आहे.

        
गांधीनगरला होणाऱ्या चकरांनी माझ्यात सर्वात  मोठा कुठला बदल झाला?  मला वाटतं नरेंद्र मोदींबाबत माझं मत पूर्णपणे बदललं. मत बनवण्याची माझी एक पद्धत आहे. कुणी कितीही सांगितलं तरी इतरांच्या सांगण्यावरून माझं अमुक अमुक म्हणून मत बनत नाही. एक तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो किंवा मग सारासार विचाराची फुटपट्टी लावतो. मोदींबाबतही तसेच. 




        
मोदींबात पाच सहा वर्षापासून उलटसुलट बरंच काही ऐकून झालंय. त्यामुळे नैसर्गिकरित्या एक प्रतिमा डोक्यात तयार झाली. गुजरात दंगे घडवणारे मोदी. ते वास्तव आहेच. ते मोदीही नाकारणार नाहीत. पण तरीही मी मोदींच्या नेतृत्वानं भारावलोय.




      
गुजरातमध्ये सध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरु आहे. हे पाचवं जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातून उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरु केलेलं हे संमेलन दरवर्षी भरतं. एका व्यासपीठावर येण्याचं टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजूला बसलेले दिसतायत. एवढंच नाही तर टाटागोदरेज,        महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबत देशोदेशीचे उद्योगपती गुजरातच्या गुंतवणुकीवर चर्चा करतायत. मोदींना हे जे जमलंय ते केंद्राला तरी जमेल?



           गुजरात हे उद्योगी लोकांचं राज्य आहे. इथले लोक रेल्वेत टक्क्यांच्याच गप्पा मारतात हा माझा अनुभव. पण मोदी फक्त व्यापाऱ्यांचंच हित सांभाळतात कानाही. मोदींनी  गेल्या काही काळात राबलेल्या काही भन्नाट आयडीया त्याचा पुरावा. काही आठवड्यांपूर्वी गेलो होतो त्यावेळेस तिथं मोदींच्या स्वागतमची चर्चा सुरु होती. मी थोडीशी माहिती घेतली आणि अवाक झालो. 




      
स्वागतमची आय़डिया अशी. समजा तुमचं एखादं काम भूमी अभिलेख कार्यालयात आहे आणि तिथला अधिकारी तो करत नसेल तर ते काम घेऊन तुम्ही तालुकास्वागतममध्ये जायचं. तहसिलदार दर्जाचा किंवा वरिष्ठाकडे तक्रार द्यायची. समजा त्यानंही काम नाही केलं तर जिल्हा स्वागतममध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे जायचं. जिल्हाधिकाऱ्यानेही तक्रारीची दखल घेतली नाही तर मोदींकडे जायचं. मोदीस्वागतममध्ये आलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठवल्या जातात. संबंधीत अधिकाऱ्यांसह राज्यभरातले जिल्हाधिकारीएसपी मोदींसमोर लाईव्ह असतात. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे दर काही महिन्यांनी सीएम स्वागतम असतंच.





         
तक्रारदाराला मोदी बाजूच्या खुर्चीवर बसवतात आणि संबंधीत अधिकाऱ्याला जाब विचारतातका रे बाबा या व्यक्तीचं काम का नाही झालंअधिकाऱ्यानं जर सांगितलं की तक्रारदारानं आवश्यक असलेले कागदपत्रं पुरवली नाहीत तर मोदी तक्रारदाराला विचारतात..समजा चूक अधिकाऱ्याची असेल तर मोदी तिथंच आदेश जारी करतात. आणि समजा तक्रारदारानं आवश्यकबाबींची पूर्तता केलेली नसेल तर त्याला तसं सांगतात. पण मोदी निर्णय देतात हे नक्की. विशेष म्हणजे हिरोगिरी करत नाहीत. म्हणजे उगीचच अधिकाऱ्यांना झापत नाहीत किंवा तक्रारदार सरळ मोदींकडेच आला असेल तर त्याला अगोदर संबंधीत पहिल्या अधिकाऱ्याकडे पाठवतात. तालुका स्वागतममध्ये हे विशेष.
    



   स्वागतममध्ये जाऊन आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलेलं अनुभव अधिक बोलका आहे. एक जण मोदी स्वागतममध्ये एका अनाधिकृत बिल्डिंगची तक्रार घेऊन गेला. बिल्डींग तर अनाधिकृत आहेच पण सोसायटीतले लोक त्रास देतायत अशी तक्रार. मोदीनं संबंधीत शहराच्या जिल्हाधिकारी आणि संबंधीत पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं की तक्रारीत किती तथ्य आहे?  अधिकाऱ्याला स्पष्ट उत्तर देता येईनात्याची तारांबळ उडालीमोदींनी एक साधा प्रश्न विचारला की बिल्डींग अनाधिकृत आहे की नाहीअधिकाऱ्यानं अखेर सांगितलं हो..अनाधिकृत आहे..मग पाडली का गेली नाही?मोदींचा पुढचा प्रश्न. कारण बिल्डींगमध्ये सगळे दादा लोक राहतात. अधिकाऱ्याचं उत्तर..मोदींनी फॅक्सवरून बिल्डींगचे सगळी कागदपत्रं लगेचच मागवून घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती तिथंच तपासली आणि बिल्डींग अनाधिकृत असल्याचं सांगितलं. मोदींनी आदेश दिला की ही बिल्डींग उद्या संध्याकाळपर्यंत पडली पाहिजे मग ती कुणाचीही असो आणि तसा रिपोर्ट सादर करा... मोदींचा झटपट निर्णय. 




         
या स्वागतमचा परिणाम असा आहे की कुठलाच अधिकारी एखाद्या व्यक्तीला भेटायचं टाळू शकत नाही. कारण भेट टाळली तर तो तक्रार मोदींकडे घेऊन जाईल अशी भीती. त्यातून अधिकाऱ्यांना तक्रारदारांची फक्त भेटच घ्यायचीय असं नाही तर तक्रारीचं निवारणंही करायचंय म्हणजेच काहीही करून कामातून सुटका नाही. आपल्याकडे कधी हे होईलआमदारमंत्र्यांचा दरबार भरवला तर त्यात तेच गायब असतात आणि अधिकारीही तिकडं फिरकत नाहीत.
      




   मोदींनी इतर राबवलेल्या काही कल्पनांनी तर अवाक व्हायला होतं. गुजरातला वाचतं करायचंय तर काय करावंमोदींनी सांगितलं वाँ
 ​ ​
जरात’. म्हणजे राज्यातल्या सामान्य लोकांसह सगळे अधिकारी मग तो कारकून असो की सुपर क्लास वन. सगळ्यांनी कुठल्याही वाचनालयात जाऊन तासभर वाचायचं. काहीही वाचा पण वाचा. त्याची सुरुवात खुद्द मोदींनी केली. मोदीच गेले म्हटल्यानंतर मंत्री गेलेअख्ख मंत्रीमंडळ गेलं म्हणजे अधिकारीही गेलेचजावंच लागणार तसा अधिकृत आदेश असतो. अन्यथा कारवाई त्यामुळे दांडीला संधी कमी. वाचनाचा अहवाल अधिकाऱ्यांना सादर करावा लागतो. त्यावर चर्चा होते. आपल्याकडे जसं ज्ञानेश्वरीचं पारायण होतं तसं गुजरातमध्ये वाँछे गुजरातची पारायणं लागली. अख्खं गुजरात वाचत राहिलं. एका कल्पनेनं अख्खा गुजरात जोडला गेला. करिश्मा तयार होणार नाही तर काय?

       


        पुढच्या दोन आयडिया ऐकल्यानंतर तर तुम्हीही मोदींना दाद द्याल. मोदींनीगुणोत्सव’ नावाचा कार्यक्रम राबवला. म्हणजे राज्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मग तो क्लास वन असो की सुपर क्लास वन. प्रत्येक दिवशी पाच असं तीन दिवस १५ शाळांमध्ये जाऊन शिकवायचं.  तीन दिवसांसाठी ही त्यांची अधिकृत ड्युटी. राज्याच्या मुख्य सचिवाचीही सुटका नाही. काय शिकवलं त्याचा अहवाल सादर करायचा. कुठल्या अधिकाऱ्यानं कुठल्या शाळेत शिकवायचं याची अधिकृत लिस्ट दिली जाते. कुणीही उठून कुठेही जायचं नाही आणि पाट्या टाकून यायचं नाही. गावात गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी बोलायचं. समस्या जाणून घ्यायच्या. एखाद्या घरातले जर मुलीला शाळेत पाठवत नसतील तर त्यांच्याशी बोलायचं. पुस्तकगणवेशाचा प्रश्न असेल तर तो तिथंच सोडवायचा. परिणाम असा की राज्याच्या मुख्य सचिवालाही शाळेची काय स्थिती आहे हे कळतं आणि लोकांनाही सरकार आपल्या शाळेत येतं याचं समाधान वाटतं. परिणाम गुजरातमधल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. मतदानाची टक्केवारी होती ९२ टक्के. सत्ता अर्थातच भाजपाचीच म्हणजेच मोदींचीच.











         
लोक आणि प्रशासन यांच्यातलं अंतर मिटवायचं?  काय करावं?  मोदींनी सांगितलंखेलोत्सव’ म्हणजे अख्ख्या गुजरातनं खेळायचं. कल्पना चांगली आहे पण वाटतं तितकी सोपी नाही. पैसाव्यवस्था राबवावी लागते. पण ती हिट झाली. खेलोत्सवमध्ये अगोदर गाव पातळीवर लोकास्थानिक नेतेअधिकाऱ्यांनी खेळायचं. खेळ कुठलाही असो. खेळायचं. नंतर तालुक्यावर खेळायचं त्यानंतर जिल्ह्यावर नंतर विभागावर आणि नंतर फायनल राज्यपातळीवर. इथंही सगळं अधिकृत... खेळासाठी मोदी सरकार पैसे उपलब्ध करतं. खेळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ड्युटी तशा लावल्या जातात. गावतालुकाजिल्हा,विभाग सगळीकडे खेळ होतायत म्हणजेच आपोआपच मैदानं तयार झालीअसलेली सुधारलीनवीन खेळाडू मिळाले. अधिकाऱ्यांसोबत दोन हात करायची संधी लोकांना मिळाली. लोकांचा आणि अधिकाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहणारा. काही अधिकारी त्यांच्या टीमची चर्चा करतायत हे दृश्यच मला सुखावणारं होतं. मोदी द ग्रेट.




         आणखी एक गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाही. आता ज्या ठिकाणी व्हायब्रंट गुजरात समिट होतेय तिथंच मोदींनी महात्मा मंदिर उभारलंय. मंदिर म्हणजे गांधीजींचं मंदीर नाही तर त्यांच्या नावावर एक मोठी वास्तू उभी केली आहेज्यात समिट होत आहे. महात्मा मंदिराची उभारणीही भन्नाट झाली. मंदीराच्या पायाउभारणीचा दिवस ठरवला. त्या दिवशी प्रत्येक गावच्या सरपंचाला गावची माती आणि पाणी घेऊन गांधीनगरला बोलवलं. खुद्द मोदींनी प्रत्येक सरपंचाकडून माती-पाणी स्वीकारलं आणि त्यातून पायाभरणी झाली. प्रत्येक जोडप्याची व्यवस्थित आणून सोय केली. बोलवलं आणि वाऱ्यावर सोडलं असं नाही. मोदींच्या एका कल्पनेनं दूर गावात असलेला गावकरी आणि समिटमध्ये बसून चर्चा करणारा उद्योगपती जोडला गेला. चर्चा करणारे कुठल्या तरी दुसऱ्या जगातले लोक आहेत ही भावना त्या गावकऱ्याच्या मनात येण्याऐवजी तो आपसूकच उद्योगपतींशी जोडला जातो. म्हणजे भारत आणि इंडिया मोदींनी एका कल्पनेनं जोडण्याचा प्रयत्न केलाय.




        
गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही जुळी भावंडं. दोन्ही सुवर्णमहोत्सव साजरा करतायत. मला महाराष्ट्रात एकदाही त्याचा फील आला नाही. गुजरातमध्ये त्याचा विसर पडत नाही. मी इथं एकही प्रश्न उपस्थित करणार नाहीकारण हे वाचल्यानंतर जे तुमच्या मनात येईल तेच माझ्या मनात आहे.

     

माणिक मुंढे ह्यांच्या सौजन्याने )

मंगळवार, ३ जून, २०१४

असाही एक घटस्फोट ( एका अमेरिकन विनोदाची कल्पित गोष्ट )














माईक घरी आला तो खुप थकुन गेलेला होता. आल्या आल्या त्याने किचनमध्येच धांव घेतली आणि रेफ़्रिजेटर ऊघडुन एक बीयरची बाटली काढली. हातानेच त्याचे झांकण पिरगाळुन काढले, तेव्हढ्या गडबडीतही त्याचे सर्वस्व असणा-या बास्केटबॉल खेळाडूची-कोबी ब्रायंटची त्याला आठवण आली आणि त्याच्यासारखाच नेम धरुन त्याने ते झांकण समोरच्या कोप-यात असलेल्या एका कच-याच्या डब्यांत, जणु ते बास्केटबॉल कोर्ट आहे अशी कल्पना करुन फेकले आणि ते नेमके त्यामध्येच बरोबर पडले. खुष होवुन आईवरुन एक सणसणीत शिवी हांसडुन तो लिव्हिंगरुम मध्ये पोहोचला आणि तेथल्या कोचावर स्वत:ला झोकुन दिले.

ह्या आनंदयात्रेत त्याला हवाहवासा असा टीव्हीचा रिमोट मात्र सांपडेना. परत एक अर्वाच्य शिवी हांसडत तो वैतागुन ऊठला आणि कोचाच्या गादीखाली लपुन बसलेले रिमोट त्याने शोधुन काढले आणि एकदाचा टीव्ही सुरु केला. हे सर्व होईतोपर्यंत अर्धी बाटली संपलेली होती. ऊरलेली घशाखाली एका दमांत रिचवुन तो परत किचनमध्ये गेला, आता मात्र येतांना त्याच्या हातांत बियरच्या दोन बाटल्या दिसत होत्या. ज्या वेगाने तो ते द्रव्य पीत होता, त्यासाठी पुढच्या कांही मिनिटांसाठी कां होईना, पण त्याला दोन बाटल्यांची तरी किमान गरज होती.

हे सारे होईपर्यंत रोजच्याप्रमाणे घरांतुन बायकोचा अजिबात आवाज आला नाही हे मात्र जरा अतिच होते आहे असे त्याला वाटले. त्याच्या मनाची स्थिती थोडी मिश्र अशी होती. आल्या आल्या तिचा तो हाय पीच मधला कंटाळवाणा आवाज ऐकु आला नाही आणि आपल्याला थोडा ब्रेक मिळाला ह्याचा खरे तर त्याला आनंदच झाला होता. पण तरीही आपण एव्हढे कामावरुन थकुन आलो आहोत, तर तिने निदान समोर येवुन "हाय हनी" म्हणण्याचे औदार्य दाखवावे, ओझरते का होईना, पण एखादे चुंबन द्यावे, अथवा किमानपक्षी स्वत:हुन आपल्याला एखादी बियर तरी आणुन देण्याचे सौजन्य दाखवावे असे त्याला वाटत राहिले पण ह्यापैकी कांहीही घडले नाही म्हणुन थोडा रागच आला. त्याने थोडी म्हणजे- दोन्ही बियर संपेपर्यंत वाट पाहिली. पण तरीही कांही हालचाल न घडल्याने त्याची जिज्ञासा जागृत झाली आणि तो बेडरुममध्ये गेला. बेडरुमची अवस्था नुकतीच एखादी वावटळ येवुन गेलेल्या जंगलासारखी झाली होती. नाही, खरं म्हणजे घरांत नेहमी कचरा असतोच, पण आजचा कचरा अगदी अतिच होता."च्यामारी, (परत एक लिहिता न येणारी शिवी) ही बाई एक तर काम वगैरे कांही करीत नाही, घरांत लहान मुलंही नाहीत, हिला आपलं हे घर साधं स्वच्छही ठेवतां येत नाही?" असे काहीसे पुटपुटतच त्याने जमिनीवर पडलेल्या दोन तीन वस्तु ऊचलल्या आणि त्या बेडवर ठेवुन तिथंच ठाण मांडलं. आणि त्याचं लक्ष तेथे एंड-टेबलवर एक पाकीट ठेवलं होतं त्याकडे वेधले. "आहा! बाईसाहेब चिठ्ठी लिहुन बाहेर गेलेल्या दिसाताहेत" असे मनाशी म्हणत त्याने ते पाकीट ऊघडले आणि तो वाचु लागला. तिने नव-यास ऊद्द्येशुन लिहिले होते:

" माय डीयर एक्स-हजबंड! मी हे पत्र-शेवटचे पत्र -तुला लिहुन आज कायमची निघुन जात आहे-तुझ्या ह्या दळभद्री घरांतुन-मुख्य म्हणजे तुझ्या तेव्हढ्याच दळभद्री आयुष्यांतुन! गेली सात वर्षे मी तुझ्याशी संसार केला, पण तुझ्याकडुन मला कांहीही परतफेड मिळाली नाही. विशेषत: गेले दोन आठवडे म्हणजे केवळ नरकवासच होता! आज दुपारीच तुला फोन केला तेव्हां तु नव्हतास म्हणुन तुझ्या बॉसशी बोलले. तो म्हणाला की तु आजच्या आज, कोणतीही पुर्व-सुचना न देतां, नोकरी सोडुन दिलीस! राजिनामा देवुनच तु तरा तरा बाहेर पडलास म्हणे! तो फोन संपविला आणि मी ही चिठ्ठी लिहुन बॅग भरुन निघाले देखील! हा अगदी शेवटचा आशेचा धागा तु आज तोडलास रे! अखेरचा घाव तु घातलास! एकतर आजकाल लोकांना नोक-या मिळत नाहीत आणि तुझी चांगली कित्येक वर्षांची सिनिऑरिटी असलेली नोकरी, तु स्वत:हुन सोडतो आहेस असे म्हंटल्यावर कोणत्या बाईचे मन था-यावर राहील? अशा पद्धतीने तु घरांत पैसा कसा आणणार आणि मला कसा सुखी ठेवणार? आणि मुख्य म्हणजे, तु असे कांही करणार आहेस ह्याची मला यत्किंचित कल्पना देखील दिली नाहीस. हे तुझे वागणे जबाबदारीचे होते असे वाटते की काय तुला? अर्थात तुझ्याकडुन अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे म्हणा!

बरे हे एव्हढ्यावरच मर्यादित असते तर देखील ठीक होते. परंतु गेल्या दोन आठवड्यांत तु ज्या पद्धतीने माझ्याशी वागला आहेस त्याला तर तोडच नाही. तुला आठवतं? मागच्याच आठवड्यांत मी मुद्दाम ब्युटी पार्लरमध्ये जावुन खुप पैसे खर्च करुन नविन हेयरस्टाईल करुन आले होते! तुझ्यासाठी राबराबुन पोर्क रोस्टचे ऊत्तम जेवणही तयार केले होते आणि तुला--केवळ तुला-- खुष करण्यासाठी सिल्कचा एक सेक्सी ड्रेसही घातला होता. हे सारे मी तुझ्यासाठी केले आणि तु? माझ्या हेयर डू कडे लक्षही दिलं नाहीस, मी केलेल्या जेवणाला तर तु हातही लावला नाहीस आणि मी नविन ड्रेस घातला आहे की जुनाच नेसला आहे ह्याकडॆ ढुंकनही पाहिले नाहीस! तु दोन मिनिटांत तिथुन सटकलास, तुझे सर्व गेम टीव्हीवर पाहुन झाल्यावर मध्यरात्रीनंतर केव्हांतरी झोपायला गेलास. हे काय वागणं झालं? माझ्यावर तुझं प्रेम आहे हे तु कधीच सांगत नाही, आपण नवरा बायको आहोत हे नातं ईतरांना कळेल असही तु कधी वागत नाहीस. ह्या सर्व गोष्टींवरुन मी एक अनुमान काढलं आहे की, एक तर तुझं दुस-या कुणावर तरी प्रेम आहे आणि तु मला फसवितो आहेस. किंवा तुझं प्रेम माझ्यावर असलच तर (पण मला नाही वाटत असं!) ते खुल्या दिलानं सांगण्याची तुझी हिंम्मत होत नाही. आणि तसं करण्यासाठी हृदयाचा--मनाचा जो मोठेपणा लागतो ना, तोच मुळी तुझ्याकडे नाही! असो! कोळसा ऊगाळावा तेव्हढा काळाच! ते कांही का असेना, अशा परिस्थितीत तुझ्याबरोबर ह्यापुढे राहाणं मला जमेल असं वाटत नाही तेव्हां मी तुला आज कायमची सोडुन जाते आहे."

तुझी--
आता कोणतेही नातं नसलेली एक्स-वाईफ

ता..: मला शोधण्याचा प्रयत्न करु नकोस म्हणजे तु करशील असं मला ऊगीचच वाटतं! तुझा थोरला भाऊ आणि मी दोघे मिळुन व्हर्जिनियाला स्थलांतर करीत आहोत. तिथे आमचा संसार सुखाने होईल ह्याची आम्हा दोघांना खात्री आहे! गूड बाय! "


ते पत्र वाचताच माईक एक क्षणभर विस्मित झाला. त्याच्या चेह-यावर अगदी मनापासुन मिळते तसे समाधान दिसु लागले. "आंधळा मागतो एक डोळा---" अशी त्याची मन:स्थिती झाली! आपल्या बायकोने-म्हणजे आताच्या एक्स-वाईफने आपल्याला पत्र पाठविले आहे तेव्हां त्याला ऊत्तर देणे आपले परम कर्तव्य आहे असं त्याला वाटलं! मात्र त्या आधी एक दोन महत्वाचे टेलीफोन्स करुन मगच तो पत्र लिहायला बसला:

" माय डीयर एक्स वाईफ! माझ्या आयुष्यांत कधीही मिळाले नव्हते एव्हढे समाधान आज मला कितीतरी वर्षांनी मिळाले आहे.! तुझ्या पत्रामधली फक्त एकच गोष्ट तु खरी लिहिली आहेस आणि ती म्हणजे आपल्या लग्नाला ७ वर्षे पुर्ण झाली आहेत! ही सारी वर्षे मी कशी काय काढली आणि तरीही मला वेड कसे लागले नाही हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होवु शकेल. मात्र ते राहु दे बाजुला! तुझ्या पत्रात लिहिलेल्या सर्व आरोपांचे खंडन करणे ह्या साठीच हे पत्र मी लिहितो आहे. अन्यथा तुझे मला सोडुन जाणे म्हणजे "सुंठीवाचुन खोकला गेला" असेच मला वाटते आहे.!

होय हे खरे आहे की दिवसभर मर मरेतो काम करुन घरी आल्यावर रोज विरंगुळा म्हणुन मी एक दोन बीयरच्या बाटल्या फस्त करतो आणि शांतपणे बसुन टीव्ही पहातो. तुझा तो हाय पीचमधला गेंगाणा आवाज टीव्हीच्या आवाजामुळे थोडा सुसह्य करणे एव्हढाच त्या मागे माझा ऊद्द्येश्य होता! तुला माहिती आहेच की मी दिवसभर कामानिमित्ताने बाहेर असतो आणि खुप थकुन घरी येतो, तेव्हां निदान तु माझ्याबरोबर येवुन पांच दहा मिनिटे सुख दु:ख्खाच्या गप्पा मारशील असं मला गेले सात वर्षं सतत वाटत आलं आहे. पण कसचं काय? अपवाद म्हणुन का होईना एकही दिवस तु माझ्या बरोबर बसुन टीव्ही पाहिला नाहीस अथवा मला एका शब्दाने देखील कधी विचारले नाहीस की "हनी तुझा दिवस कसा गेला रे आज" किंवा "खुप थकला असशील ना? चल आता थोडा आराम कर आणि मी गरमागरम जेवायला वाढते" पण एव्हढे माझे नशिब थोर नसावे!

हो, पण तु म्हणतेस त्या प्रमाणे तु केलेला नविन हेयरडू मी पाहिला बरं का! पण तुला खरं सांगु का? तु त्यामध्ये एखाद्या बाईसारखी दिसत नव्हती तर एखाद्या पुरुषासारखी दिसत होती! माझ्या आईनं मला लहानपणीच शिकविलं आहे की "आपल्याला कुणाविषयी चांगलं बोलायचं नसेल, तर निदान दुस-याला दुखवेल असं बोलु तरी नये! गप्प बसावं!" आणि मी माझं प्रामाणिक मत तुला द्यायचं ठरवलं असतं तर तुझ्या भावना दुखावल्या गेल्या असत्या! म्हणुन मी गप्प राहिलो आणि कांहीही बोललो नाही!

तु माझ्यासाठी मुद्दामुन पोर्क रोस्ट केला असं म्हणालीस. परंतु गेल्या सात वर्षांत मी एकदा तरी नॉन-व्हेज खाल्लं आहे कां? मी संपुर्ण शाकाहारी आहे हे तुला सात वर्ष लग्न होवुनही आठवत नाही ह्याला तुझी विस्मरणशक्ती म्हणावी की सोयिस्कर गैरसमजुत!? कदाचित तु मी आणि माझा थोरला भाऊ ह्या मध्ये गल्लत तर करीत नाहीस ना? कारण पोर्क रोस्ट ह्या त्याचा आवडता मेनु आहे! माझा नव्हे!

बरं तु ज्या सिल्क ड्रेसविषयी बोलते आहे तो मी पाहिला होता आणि खर तर त्यामध्ये तु किती सुंदर दिसते आहेस हेही मी तुला सांगणारच होतो. पण तेव्हढ्यांत माझ्या लक्षांत आलं की त्या ड्रेसवर त्याच्या किंमतीचे $49.95 चे लेबल तु काढले नव्हते! आणि आदल्याच दिवशी माझ्या थोरल्या भावाने माझ्याकडून $50 बारो केले होते हा केवळ योगायोगच असु दे म्हणुन मी देवाची प्रार्थनाही केली. आणि म्हणुनच तुला लागेल अथवा दु:ख्ख होईल असे मी कांहीच बोललो नाही!

पण ते असु दे! हे सर्व घडत असतांना देखील माझे तुझ्यावर प्रेम आहे हे माझ्या लक्षांत आले. ह्या सर्व अडचणींवरही आपण मात करु, आणि ह्यातुनही मार्ग काढुच काढु असा मला आत्मविश्वास होता! लग्न झालेल्या जोडप्यांच्या अशा अडचणींवर सल्ला देणारे लोक --मला वाटतं त्यांना Marriage Councilor म्हणतात हे Consulting साठी भरपुर पैसे घेतात हे मला माहित होते आणि ते कुठुन ऊभे करावे आणी त्यांचा सल्ला घेवुन आपले लग्न वांचवावे, ह्या विचारांत असतांनाच एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली! मला आज सकाळीच $200 मिलियन डालर्सची लॉटरी लागली. तुला हे कधी सांगतो आहे असं मला झालं होतं. तुला सरप्राईझेस आवडतात म्हणुन मी मुद्दामुन फोन केला नाही, तडक हापिसांत गेलो आणि राजिनामा दिला, आपल्या दोघांच्या व्हेकेशनसाठी दोन जगप्रवासाची तिकिटेही आणली. आणि घरी आल्यावर तुझं पत्र वाचुन खरं तर मीच सरप्राईझ झालो! पण गेल्या दोन दिवसांत घडलेल्या ह्या सर्व घटना पाहुन माझी खात्री पटली आहे की कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही! आणि घडलेल्या घटनांच्या मागे आपल्याला माहित नसलेली कोणती तरी पुर्वनियोजित अशी शक्ती असते!

आता हेच पहाना! मला लॉटरी लागते काय आणि तु त्याच दिवशी मला सोडून जाते काय? हो बरं आठवलं! आत्ताच मी वकिलाला फोन केला आणि त्यांना तुझं हे शेवटचं पत्र वाचुन दाखविलं. त्यानं सांगितलं की तु लिहिलेलं हे शेवटच पत्र, तुला आणि मला विनासायास घटस्फोट मिळवुन द्यायला खुप ऊपयोगी पडेल आणि इतकच नव्हे तर त्या पत्रामुळे मला मिळालेल्या ह्या घबाडांमधला एक सेंटदेखील तुला मिळणार नाही. त्याबाद्दल तुझे किती आभार मानु तेच मला कळत नाही!

तु ते शेवटचं पत्र लिहिण्याची फार घाई केलीस असं नाही वाटत तुला? एक दिवस ऊशिरा लिहिलं असतं तर निदान लॉटरीतले निदान $100 मिलियन तुला नक्कीच मिळाले असते. मला खुप वाईट वाटतं आहे की तुला ह्यांतला छदामही मिळणार नाही! पण तु मात्र वाईट वाटुन घेऊ नकोस! कारण मी वर लिहिल्याप्रमाणे कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही! बर तर मग, ह्यापुढे आपला कोणताही संबंध नसेल. जिथे असशील तिथे सुखी रहा! आणि काळजी घे!


तुझा .....
(छे, चुकुन लिहिलं तुझा म्हणुन-काय संबंध?) आणि ह्या पुढे मिलिनीयर म्हणुन ओळखला जाणारा, एक्स हजबंड!


ता..: हे सारं लिहितांना तुला एक विचायचं राहिलच! माझा भाऊ कार्ल ज्याच्याबरोबर तु पळुन गेली आहेस, तो जन्मला तेव्हा कार्ला (मुलगी) होता! त्याने सांगितलं आहे ना तुला हे? तुला ह्या बातमीचा ऊपसर्ग होत नाही असं गृहीत धरतो!




--शशिकांत पानट

डिसेंबर ९-२०१३


---------------------------------------------------------------------------------------------------------