शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१२

हृदयाला भिडणारी गोष्ट.......!!










माझ्या आईला एकच डोळा आहे. त्यामुळे मी सतत चिडवला जातो नेहमी मी शरमेने मन खाली घालून घरी जातो तिला माझ्या शाळेतील व गल्लीतील मुले " ए का क्ष " म्हणत. माझी आई विध्यार्थी आणि 
शिक्षकांना जेवण करून जेवू घालते व आपल्या संसारात हातभार लावते तसेच आम्हाला  पण सांभाळत असे. 

एके दिवशी माझी आई मला भेटायला माझ्या शाळेत आली. तिला माझ्या वर्गातील मुलांनी बघितले आणि मला चिड्वीत म्हणाले " ईईई sss तुझ्या आईला एकाच डोळा ? 
तू एकाक्षचा मुलगा मला मेल्याहून मेल्या सारखे झाले आणि मी आईवर रागावलो .वाटले अशी आई नसती तरी चालले असते आणि तिला म्हणालो " तुला मला सर्वांसमोर हास्यास्पद बनवायचे होते म्हणून तू   शाळेत आलीस त्या पेक्षा तू मेलेली बरी "

आईने चकार शब्द्द उचारला नाही व रागावलीपण नाही .मी मात्र भयंकर तिच्यावर रागावलो. त्यामुळे तिला ह्या गोष्टीमुळे  किती  यातना झाले असतील ह्याचा विचार पण माझ्या मनाला शिवला नाही. 
मनात एक पक्का विचार केला कि काही झाले तरी आपण हिच्या पासून दूर जायला पाहिजे आणि काही दिवसांनी मला एक संधी मिळाली दुसर्या देशात जाण्याची. मी मागचा पुढचा विचार न करता प्रयाण केले.















बराच काळ लोटला या गोष्टीला मी उच्च शिक्षित झालो . माझे लग्न पण झाले मी सुंदर घर घेतले आणि त्यांत माझा संसार थाटला व माझ्या दोन गोजीरवाण्या मुला समवेत मजेत राहत होतो. 


अचानक एके दिवशी माझी आई दारात उभी राहिली मला आश्चर्य वाटले पत्नी व मुले ह्यांनी तिला कधीच पाहिलेले नव्हते .मुले तिच्या कडे पाहून घाबरत फिदी हिदी हसत होते .मी आईवर ओरडलो , रागावलो व म्हणालो इथे का आलीस न बोलावता ..जा चालती हो इथून..!

आई शांतपणे म्हणाली " माफ कर मला मी चुकीच्या पत्यावर आले ..आणि तत्काळ तिथून नाहीशी झाली "



एके दिवशी एक आमंत्रण पत्रिका मिळाली ती आमच्या गावाकडच्या शाळेकडून आली त्यांत सर्व माजी विध्यार्थ्यांचे स्नेह- संमेलन भरविण्यात येत आहे तेव्हा अगत्याचे आमंत्रण होते. ते वाचून माझ्या मनात जुन्या आठवणीचा मागोवा सरकन येवून गेला . मी स्नेह-संमेलनात सहभागी होण्याचे ठरविले पण माझ्या पत्नीस माझे पूर्व आयुष माहित नव्हते आणि मी ते तिच्या पासून लपवून ठेवले होते. त्या जुन्या कडवट आठवणी तिला संगावायाच्या नव्हत्या म्हणून मी बाहेर गावी व्यवसायानिमित्त चार दिवस जात आहे असे सांगून गावी गेलो. 

आजी माजी विध्यार्थ्याचे स्नेह संमेलन अगदी व्यवस्थित पार पडल्या नंतर सहज मनात आले आपण राहत होतो त्या जागी जाऊन पाहावे .आमचे घर जमीनदोस्त झालेले बघितले आणि शेजार्यांनी जातीने 
चौकशी केली व माझ्या हातात एक चिठी देवून म्हणाले " तुझ्या  आईचा मृत्यु झाला पण शेवटच्या क्षणी तिने ही चिठ्ठी तुला देण्यासाठी बजावून गेली "


ती चिठ्ठी अशी होती-------



चि. , प्रिय बाळास ,


अनेक उत्तम आशीर्वाद


तू मला सोडून गेल्या पासून सतत तुझी आठवण काढते आणि म्हणूनच मागे एकदा मी तुला भेटावयास तुझ्या  घरी आले पण मला बघून तुझी मुले घाबरली त्या बद्दल मला क्षमा कर.

जेव्हा मला कळले कि तू तुझ्या शाळेच्या माजी विध्यार्थी स्नेह्सामेलानास येणार आहेस तेव्हा आनंदाने उर भरून आले पण मी अशी आसाह्य  होवून पलंगाला खिळलेली . मला माफ कर मी अशी 
एक डोळ्याची म्हणून तुला लोक हिणवीत असत आणि त्याचा फार त्रास झाला आणि सतत माझ्यावर रागावत होतास.

त्याच रागाच्या भरात घर पण सोडलेस असो, अरे बाळा जेव्हा तू लहान होतास तेव्हा तुला एक मोठा अपघात झाला आणि त्यांत तू तुझा एक डोळा गमावलास .तुझी ती असाह्यता व एक डोळा नसतानाचे तुझ्या  उर्वरित आयुष्याचा विचार करून मी माझा एक डोळा तुला दिला.

 जेव्हा त्या डोळ्याने तु बघु शकतोस त्या वेळी माझा आनंद गगनात मावेनासा झाला ,या पुढे तुझे आयुष सुरळीत जाईल ह्याची खात्री झाली . तो क्षण इतका आनंदमय होता कि मला एक डोळा नसल्याचे माझ्या पार विस्मरणातून गेले कारण त्याच डोळ्यांनी तू हे सुंदर जग व त्याचे सौंदर्य बघू शकतोस याचाच ज्यास्त आनंद होता.

मी देवाजवळ प्रार्थाना करते कि तुझे व तुझ्या कुटुंबाचे पुढील आयुष सुखा समाधानाने जाओ .


बाळा आजही मी तुझ्यावर उदंड प्रेम करते..


तुझी आई.











सारांश ----नेहमी आपल्या आई वडिलांवर प्रेम करा व त्यांचे आशीर्वाद मिळावा. आयुष्यांत आई एकच असते तिच्यावर प्रेम करा अन्यथा ती गेली तर पश्चाताप करीत बसण्याची तुमच्यावर पाली येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: