भारतीय लोकशाहीस आता हवे आहे द्वीपार्टी चे राजकारण .......!
( एक व्यंगात्मक लघु लेख )
भारताला स्वातंत्र्य मिळून आज ३६ वर्षे झाली आणि ह्यापैकी सर्वात जास्त काळ कॉंग्रेसने
भारतावर राज्य केले . स्वातंत्र्य पूर्व काळापासून कॉंग्रेस ही चळवळ होती आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय पक्ष बनला . कालांतराने अनेक बऱ्याच पार्ट्या ( पक्ष ) मतदानाच्या रिंगणात आल्या त्यापैकी जनसंघ ( आताची भारतीय जनता पार्टी ) डावे, उजवे कामुनीस्ट व ढीगारयानी प्रादेशिक पार्ट्या कुत्र्याच्या छत्री प्रमाणे उगवल्या . काहीं कॉंग्रेस नाराज लोकांनी स्वतःचे वेगळे पक्ष काढले जसें राष्ट्रवादी कॉंग्रेस, त्रिणमुल कॉंग्रेस, ऐ डि यम के, डि यम के, टी यम सी , टी डि के, यस पी, बी यस पी, इत्यादि.प्रत्येक पक्षाचा उद्देश निराळा व एकमेकास न पटणारा असा एक राजकीय घोळका भारतात निर्माण झाला .
देशातील दोन राष्ट्रीय पक्ष म्हणजे कॉंग्रेस व भा ज पा हें होत .कॉंग्रेस स्वतःला सेकुलर ( निधर्मवादी ) म्हणवि
परदेशी हितसंबंधी , धर्मांध संस्था व मतदाताची मतदांन प्रक्रियेत दिसणारी उदासीनता ह्या मुळे दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षाना सरकार स्थापण्यास पुरेसे लागणारे संख्याबळ मिळेनासे झाले . तेंव्हा पासुन मिली जुली सरकार ( आघाडी चे राजकारण व सत्ता ) सुरु झाले .
देशाचा राज्यकारभार सुचारुपणे चालविणे दिवसे दिवस कठीण होत आहे . ह्या मुळे भारतीय राजकारणास स्थिरता मिळेनाशी जाहली . कारण प्रमुख पक्ष ईतर अनेक प्रादेशिक पक्षाना घेवून सरकार चालवताना अनेक अडथळे व प्रत्येक पक्षाची राजकीय इच्छे मुळे सुचारूपपणे चालण्याची प्रथाच मोडकळीस आली. राज्य करणाऱ्या पक्षास स्वहित व ईतर पक्षाचे हित जपणे अशा दुहेरी कात्रीत सापडलेली आढळते. ह्याचा परिणाम देशाच्या प्रगतीवर होत आहे कोणतेही देशहित काम होणे दुरापास्त झाले त्यातून असंख्य आर्थिक घोटाळ्यामुळे देशाचा करभार आणि सर्व आघाडीवरची प्रगती कासवाच्या गतीने होत आहे.
ह्या सर्वावर एकाच तोडगा संभवतो ( जरी तो हास्यास्पद असेल ) व असंभव पण असेल तरी खालील विचार बघा आपणास पटतात का ?
सध्या भारतीय राजकारणामध्ये दोनच मुख्य पक्ष आहेत एक कॉंग्रेस व दुसरी भाजपा ह्या दोनीही पक्षांत मत-मतांतर आहेत हें आपण सर्वच जाणतो तरी पण राष्ट्रहितासाठी व स्वहितासाठी दोघेही एकमेकाच्या जवळ आले व आघाडी तत्वावर राज्यकारभार केला तर....भारतीय राजकीय पटलावर काय धमाल होईल नाही ?
प्रथम ह्या दोन्ही पक्षांनी मिळून एक नवीन पक्ष स्थापावा व त्याचे नामकरण " कॉंग्रेस भारतीय पक्ष ' " व दोघांनी आपल्या मत मतांतारावर असा तोडगा काढावा कि जेणे करून प्रत्येकाची राजकीय व आर्थिक इच्छा जोपासली गेली जाईल .
दुसरे म्हणजे डावे, उजवे कामुनीस्ट ईतर क्षेत्रीय पक्ष मिळून एक पक्ष किवां आघाडी झाली कि मग देशात फक्त दोनच पक्ष राहतील व हें सर्वजण आलटून पालटून राज्य करतील .
समजा अश्या प्रकारचा समझोता खरेच झाला तर ' काँग्रेस भारतीय पक्ष " निवडणुका जिंकून राजकारभार करील व काहीं वाटाघाटी होतील व एका समान कार्यक्रम व जागा वाटप ह्यावर समझोता होईल.
कदाचित तो "समझोता " असा असेल ........
१) दोन पंतप्रधान असतील ( भारतीय घटनेत दुरुस्ती करून ) एक कामकरणारा व दुसरा बिनकामाचा . आतां पर्यंतच्या सध्याच्या पंतप्रधानाची कामगिरी बघता त्यांना बिनकामाचा व आडवाणी यानां कामाचा पंतप्रधान बनवावे.
२) सोनिया गांधी यांना अजिवन पक्षाचे अध्यक्ष पद व राजपुत्र राहुल यास अजिवन पक्षाचे बोधचिन्ह म्हणून वापरावे तर श्री. वाजपेईना पक्षाचे खंदे वक्ते व कवी म्हणून नेमावे.
३ ) पूर्वीच्या कॉंग्रेसचे वफादार म्हणून अंथोनी व चिदंबरम यानां अनुक्रमें गृह नसलेले गृहखाते व अनर्थमंत्री नेमावे. तसेंच लॉं आणि डिसआर्डर आणि मिस फार्मेशन व ब्राड कास्टिंग खाते अनुक्रमें जेटली व सुषमा यांना देण्यात यावे.
४) पूर्वी कांग्रेस व भाजपा सेक्युलर, हिदुत्व विचारधारा ठेवत असत आता युतिमुळे त्यांनी एक नवी विचारधारा " सांस्कृतिक " घ्यावा म्हणजे सर्व राजनीतिक लोकांत एकाच प्रकारची " संस्कृती ' असेल......... ती कोणती ? आपण सुज्ञ जाणताच.
५ ) " राम मंदिर " उभारण्याचा प्रश्न अश्या प्रकारे सोडवावा कि मंदिर त्याच जागी उभारावे पण त्याचे निर्माण कार्य कलमाडी यांच्याकडे द्यावे म्हणजे ते कधीच पूर्ण होणार नाही व तसेंच भिजत राहील.
६ ) भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलने, उपवास करणारे गांधीवादी श्री हजारे यानां भारतीय वकील बनवून अंटा र्टीकेस पाठवावे कारण आपले राजकीय संबंध आणखी जास्त मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान कामी येईल.
बाबा रामदेव यानां भारतीय योगी म्हणून संपूर्ण जगात पाठवावे व भारतीय योग ह्याची दिक्षा देत सतत फिरत राहावे ह्यामुळे योगास जागतिक मान्यता मिळेल.
७ ) नरेंद्र मोदी जें दोघानाही डोईजड होतील त्यांना प्रधानमंत्री म्हणून शेजारच्या हिंदू राष्ट्र नेपाळला नेमावे कारण जगात तेचं एक हिंदुराष्ट्र आहे. मोदी एक सच्चे कार्यकर्ते आहेत व त्यां देशातील सर्व दुर्लक्षित गोष्टीकडे व मागासलेले असल्यामुळे ते सर्व ठीक ठाक करतील यांत शंकाच नाही.
वरील सर्व समझोत्या प्रमाणे झाल्यास भारतीय जनता खऱ्या अर्थाने शांततेत जिवन जगु शकेल अशी आशां करू व राज्यकारभार पण सुचारुपणे चालेल. भारतीय संसद कोणतीही बाचाबाची, हुल्लडपणा न होता १०० दिवसाच्या वर चालेल ह्याची खात्री असेल व सर्व निवडून आलेले राजकीय नेतेगण शांतपणे आपआपली अ-लोकोउपयोगी कामे करतील अशी आशां करुया.
!!!.......जय भारत............ मेरा भारत महान..........!!!
---------------------------------------------------------------------------------------------------------
( हा लेख श्री जुग सरय्या ह्यांच्या TOI मधल्या टिप्पणीच्या आधारे लिहिला )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा