मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

सच्ची कहाणी डॉलर विरुद्ध रुपया.........








अमेरिका गेल्या ७० वर्षापूर्वीच आपल्या डॉलरची किमत सोन्याच्या भाव प्रमाणे ठरवत नसून पेट्रोलच्या  भावाशी निगडीत ठेवली आहे. कारण त्यांना कळले कि सोने आणि पेट्रोल ची किमत सारखीच आहे म्हणून त्यांनी मिडिल इस्ट मधील देशा सोबत एक करारनामा केला आणि त्यामुळे  ते लोक पेट्रोल डॉलर मध्येच  विकतात.

 ह्याच कारणाने त्यांच्या डॉलरवर छापलेले असते " this note is legal tender of all debts  pablic and privete " ह्याचा अर्थ जर का  तुम्ही  डॉलरच्या किमती  बदल्यात सोने मागितले तर त्यांचे गव्हर्नर देणार नाहीत . ह्या उलट भारत सरकाचा रुपया म्हणतो "  ” I promise to pay the bearer ......' असे नोटेवर छापलेले असते आणि खाली रिझर्व ब्यांकेच्या गव्हर्नरची सही आहे. याचा अर्थ जर तुम्ही रुपयाच्या किमती बदल्यात सोने घेवू शकता असा होतो .

डॉलरचा रेट खाली आणू शकू जर भारतीयांनी एक आठवडा आपली वाहने रस्त्यावर आणली
 नाहीत तर होणार्या पेट्रोल बचती मु ळे  डॉलरची किमत कमी होईल हे सत्य आहे कारण डॉलरची किमत   पेट्रोलशी  निगडीत आहे आणि  ह्यालाच  म्हणतात " Derivative Trading."


आता आपण उदाहरण  बघू या. आपला देश जेव्हा मिडिल इस्ट देशाकडे पेट्रोल विकत घेण्यासाठी जातो तेव्हा ते फक्त डॉलरच्या बदली पेट्रोल विकतात. समजा आपल्याकडे डॉलरची गंगाजळी पुरेशी नाही तेव्हा नाईलाजाने आपणास अमेरिकेकडे डॉलरची मागणी करावी लागते .ते जेव्हडे  डॉलर देतात त्या बदली आपण आपले रुपये देतो म्हणजेच तेवढ्या किमतीचे सोने नाही का ? पण गमत अशी आहे कि जर आपले मन बदलले आणि अमेरिकेस डॉलर परत करून आपले सोने घेवू तर ते देणार नाहीत व सांगतील "  Have we promised to return something back to you? Haven’t you checked the Dollar ? We clearly printed on the Dollar that it is Debt” कारण अमेरिकेस त्यांचे डॉलर चलन छापण्यासाठी सोन्याची गरज नाही ते कागदावर छापतात जेव्हा लागेल तसे.
प्रश्न असा उरतो अमेरिका मिडिल इस्ट कडून पेट्रोल डॉलर देवून घेत असेल असे  नाही भारताची खरी गोची अशी आहे कि आपणास डॉलर घ्यावे लागते पेट्रोल साठी म्हणजेच पर्यायाने तेवढ्या किमतीचे सोने देवून .जर भारतीयांनी पेट्रोलचा वापर अगदी जरुरी असेल तरच केला तर डॉलरची किमित निश्चित खाली येईल, 

दुसरा भाग म्हणजे आपल्या देशासाठी आपले उत्तर्दाइत्व   काय आहे ह्याची सर्व जनतेस माहिती  असावे .राजकारणी लोक निर्बुद्ध असल्या प्रमाणे वागत आहेत हे सत्य असले तरी त्यांना निवडून देणारे आपणच आहोत तेव्हा चुकीची दुरुस्ती आपणासच  करावी लागेल .भारताची खालावत जाणारी परिस्थिती सुधारायची असेल तर काही गोष्टी जनतेस कराव्या लागतील.

२००८ मध्ये डॉलरचा भाव रु, ३०-४० होता आता २०१३ तो रु,६३-६५ इतका झाला .ह्यावरून काय दिसते अमेरिकेची इकोनामी सुधारत आहे  नाही उलट आपली रसातळाला जात आहे हे सत्य .

आपल्या देशाची अर्थ व्यवस्था आपल्या हातात आहे जवळ जवळ ३०,००० कोटी रुपये बाहेरील देशात जात आहेत कारण जगभरातून जो माल आपल्या देशात विकला जातो त्यामुळे. परदेशी कंपनी ज्या मालाची इथे विक्री करीत   आहेत  जसे कोक,पेप्सी,पिझा ,बर्गर, सौंदर्य  ब्र्यांड ,सिंगल ब्र्यांड ,मल्टीपल ब्र्यांड वस्तू इत्यादी.जर का भारतीयांनी ठरविले कि ज्या वस्तू इथे मिळतात त्या वस्तू दुसर्या देशाच्या असतील तरी घेणार नाही आणि फक्त भारतीयच घेवू तर २/३ वर्षात आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल. 


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सौजन्य राधिका  Gr. ह्यांच्या तेलगु लघु लेखावरून …… 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: