बुधवार, ४ जानेवारी, २०१२

जागतिक भ्रस्टाचार रिपोर्ट २०११ ( जागतिक पर्यावरण बदल )......!!!


खरेच बदलते जागतिक पर्यावरण  व तसेंच जागतिक मदत कार्य  

कारणीभूत ठरेल भ्रस्टाचार वाढण्यास ..............!!!!


सन १९८० च्या मानाने स न  २०१४ पर्यंत जागतिक पर्यावरण बदलामुळे मोठ मोठे संकटे येण्याची जास्त शक्यता आहे.  जगातील जवळ जवळ ९०%  वातावरणाच्या बदलामुळे ३७५ करोड जन संख्येला  धोका सन २०१४ पर्यंत जाणवतो हें एका पाहणी नुसार स्पष्ट करण्यात आले. 




ह्या वातावरण बदलामुळे बऱ्याच नैसर्गिक  आपत्तीना सामोरे  जावे लागेल .खरा धोका तर शेती, अन्न धान्य ,आर्थिक ( मुलभूत ), पाणी आणि निवारा ह्या महत्वाच्या गोष्टीवर पडेल.

भारत  हा  तर शेती प्रधान देश आहे जर कां अशी नैसर्गिक आपत्ती  आलीतर  त्यातून   देश कसा सावरेल ?
सध्याची राजकीय परिस्थिती बघता ह्या महत्वाच्या  मुद्यावर  लक्ष द्यायला  कोणाला वेळ आहे?



अशी विपत्ती आलीच तर जगातून येणारी मदत पिडीत लोकां पर्यंत पोहचेल ही शास्वती नाही . म्हणूनच म्हंटले कि पर्यावरण बदलामुळे येणारया आपत्तींना तोड देताना जागतिक मदतीचा  भ्रष्टाचार अधिक बोकाळेल व तोच भ्रष्टाचार वाढीस  कारणीभूत ठरेल.

जागतिक  रिपोर्टा प्रमाणे जवळ जवळ १३४% जागतिक मदतीचा ओघ  जाईल पुढच्या २० वर्षात.  




 जगातील सर्वच देशाना वातावरण बदलाचा कमी अधिक प्रमाणात धोका संभवतो  असे वर्ल्ड ब्यान्केच्या रिपोर्ट  मध्ये दर्शविले आहे.
कारण सरकारी मदत योजना व त्याची अंमलबजावणी फार खालच्या क्रमांकावर आहे तसेंच सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार ह्या दोन गोष्टी  कारणीभूत ठरतिल.





खाली दिलेल्या आलेख प्रमाणे सर्वात जास्त धोका ( Exteme  ) कोणत्या देशाना आहे त्याची वर्गवारी व जागतिक क्रमांक देण्यात आले बाकी राष्ट्रे मध्यम,कमी धोका यांत मोडतात त्याची वर्गीकरण आणि क्रमांक देण्यात  आला नाही. 


पर्यावरणाच्या बदलामुळे सर्वात जास्त धोका असलेल्या जागतिक देशांची वर्गवारी  व क्रमाक


gcr_animatedmap.gif


जेव्हा अशी आपत्ती कोसळेल तेव्हां जागतिक मदतीचा ओघ त्यां  लोकांसाठी असेल जें लोक यांत होरपळले आहेत. सर्व मदत कार्य  करणार्या येन .जी.ओज . व मदत घेणारी राष्ट्रे यानां  स्वहिताची  जबरदस्त इच्छा पैसे कमावण्याचा राहील, येणारी आपत्ती ही पैश्याशी निगडीत राहील आणि त्यांमुळे भ्रष्टाचार आघीकच वाढेल ही भीती पण सतत जाणवते कारण ठरणार ते " वातावरण बदल."   





" ट्रास्परनसी इंटरन्याशनल " ने अशी आपत्ती आली तर कश्या प्रकारे मदतीचे नियोजन करावे ह्याचे नियम केले .त्याचा दावा आहे कि ह्यां नियमा प्रमाणे प्रत्येक स्थरावर  जर नियोजन केले  गेले  तर ज्यांत  तेथील  सरकार, सेवाभावी संस्था , यांच्या सहयोगाने उद्दिष्ट गाठता येईल व भ्रष्टाचार पण होणार नाही.






भारतीय जनता किती समर्थन करेल कि आपले राजकीय नेते,सेवाभावी संस्था ,सरकारी अधिकारी, व्यापारी वर्ग सचोटीने  काम करतील  यांत  शंका आहे.  





बदलते जागतिक पर्यावरण 






----------------------------------------------------------------------------------------------------------
वरील सर्व माहिती व आकडेवारी " ट्रास्परनसी इंटरन्याशनल " च्या  व  चित्रे  गुगल इमेजसच्या
सौजन्याने.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: